शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

वैनगंंगा - नळगंगा नदी जोड प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:46 IST

Jayant Patil News मुळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देमाँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे.प्रकल्पद्वारे विदर्भातील जिल्ह्यांना मिळणार ६० टीएमसी पाणी.

बुलडाणा: वैनगंगा-नळगंगा या नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो एकदा कागदावर मंजूर झाला की त्याचे पाणी विदर्भात कशा पद्धतीने खेळवायचे हे आपल्या हातात आहे. प्रामुख्याने या प्रकल्पातंर्गत ६० टीएमसी पाणी आणणे आणि विदर्भातील जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने वाटप होणे हा जो मुळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले. वैनगंगा-नळगंगा या नदी जोड प्रकल्पासोबतच पैनगंगा नदीही त्यास जोडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यांसह वाशिम, यवतमाळसह अन्य जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. माँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे. त्यासंदर्भाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

मुख्यत्वे ६० टीएमसी पाणी आणण्याचे आपले प्रयत्न आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यात निश्चितच आपण एका चांगल्या निष्कर्षाप्रत येवू असे जलसंपदामंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले.दरम्यान अमरावती विभागातील सिंचन अनुशेष दुर करण्यासाठी मधल्या काळात फारसे यश आले नाही. त्यात अडचणी आल्यात. तो दुर करण्यासाठी सध्या जिल्हानिहाय आपण बैठका घेत आहोत. सध्याच्या आढावा बैठकांचा हाच मुळ उद्देश असल्याचे ते म्हणाले. जेणेकरून या विभागातील प्रकल्पांच्या कामांना गती यावी. सोबतच अडचणी दुर होवून उपलब्ध निधी खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. सोबतच जिगाव प्रकल्पाच्या कामालाही गती देणार असून जिगाव प्रकल्प पुर्णत्वाच्या दृष्टीने केंद्राकडून उपलब्ध होणार जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी मधल्या दोन वर्षात उपलब्ध झाला नाही. तो येत्या काळात मिळेल अशी आशा आहे. यासोबतच पुनर्वसन व भुसंपादनाचे काही जटील प्रश्न मार्गी लावून येत्या काळात किमान सात टीएमसी पाणी जिगाव प्रकल्पात साठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ना. पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलbuldhanaबुलडाणा