शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

वैनगंंगा - नळगंगा नदी जोड प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:46 IST

Jayant Patil News मुळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देमाँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे.प्रकल्पद्वारे विदर्भातील जिल्ह्यांना मिळणार ६० टीएमसी पाणी.

बुलडाणा: वैनगंगा-नळगंगा या नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो एकदा कागदावर मंजूर झाला की त्याचे पाणी विदर्भात कशा पद्धतीने खेळवायचे हे आपल्या हातात आहे. प्रामुख्याने या प्रकल्पातंर्गत ६० टीएमसी पाणी आणणे आणि विदर्भातील जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने वाटप होणे हा जो मुळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले. वैनगंगा-नळगंगा या नदी जोड प्रकल्पासोबतच पैनगंगा नदीही त्यास जोडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यांसह वाशिम, यवतमाळसह अन्य जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. माँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे. त्यासंदर्भाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

मुख्यत्वे ६० टीएमसी पाणी आणण्याचे आपले प्रयत्न आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यात निश्चितच आपण एका चांगल्या निष्कर्षाप्रत येवू असे जलसंपदामंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले.दरम्यान अमरावती विभागातील सिंचन अनुशेष दुर करण्यासाठी मधल्या काळात फारसे यश आले नाही. त्यात अडचणी आल्यात. तो दुर करण्यासाठी सध्या जिल्हानिहाय आपण बैठका घेत आहोत. सध्याच्या आढावा बैठकांचा हाच मुळ उद्देश असल्याचे ते म्हणाले. जेणेकरून या विभागातील प्रकल्पांच्या कामांना गती यावी. सोबतच अडचणी दुर होवून उपलब्ध निधी खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. सोबतच जिगाव प्रकल्पाच्या कामालाही गती देणार असून जिगाव प्रकल्प पुर्णत्वाच्या दृष्टीने केंद्राकडून उपलब्ध होणार जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी मधल्या दोन वर्षात उपलब्ध झाला नाही. तो येत्या काळात मिळेल अशी आशा आहे. यासोबतच पुनर्वसन व भुसंपादनाचे काही जटील प्रश्न मार्गी लावून येत्या काळात किमान सात टीएमसी पाणी जिगाव प्रकल्पात साठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ना. पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलbuldhanaबुलडाणा