शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

लाखनवाडा सरपंचाला मारहाण; ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:45 IST

लाखनवाडा :  येथील सरपंच निर्मला समाधान देशमुख यांना ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत सदस्य सरला रमेश सावळे व सरपंच निर्मला देशमुख यांच्या शाब्दीक वाद झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली.सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

लाखनवाडा :  येथील  ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सरपंच निर्मला समाधान देशमुख यांनी दिलेल्या सरपंचपदाच्या राजीनामा पत्रावरील स्वाक्षरी सत्यतता पडताळणी करीता १८ जून रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली असता सभेच्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य सरला रमेश सावळे व सरपंच निर्मला देशमुख यांच्या शाब्दीक वाद झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. सरला सावळे व त्यांच्या समर्थकांना सरपंच निर्मला देशमुख यांना जबर मारहाण करून जखमी केले. त्यामुळे सरपंच देशमुख यांच्यावर सामान्य रूग्णालय खामगाव येथे उपचार सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही गटात हा वाद उफाळून आला आहे.  या घटनेमुळे गावात व परिसरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.(वार्ताहर)

 मी दिलेल्या सरपंचपदाच्या राजीनामा पत्रावरील स्वाक्षरी सत्यता पडताळणीकरीता १८ जून रोजी सभा सुरू असतानाच ग्रामपंचायत सदस्य सावळे व त्यांचे समर्थक यांनी माझ्यावर हल्ला करून मला जबर मारहाण केली. सदर घटनेची कुणकुण लागल्यामुळे मी पोलीस स्टेशनला अर्ज करून पोलीस संरक्षण मागितले होते. परंतु मला मारहाण सुरू असताना पोलीस, ग्रामपंचायत सभागृहाच्या बाहेर होते. त्यांनी सुध्दा मारेकºयांना आवर घातला असता तर सदर घटना टळली असती.

- निर्मला समाधान देशमुख, सरपंच लाखनवाडा.

या घटनेमागे राजकीय षडयंत्र असून मला त्यामध्ये विनाकारण गोवल्या जात आहे. घटना ही ग्रामपंचायतीच्या आवारात घडली. आपण ग्रामपंचायतीचे सदस्य नसल्याने सभेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ५०-६० ग्रामस्थांच्या उपस्थितीत विनयभंग करण्याचा प्रश्नच येत नाही.

-सुभाष सावळे, जिल्हा उपाध्यक्ष भाजप, किसान आघाडी, बुलडाणा. 

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा