शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कलावंतांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात

By admin | Updated: May 25, 2015 02:27 IST

लोकजागर परिवाराचा मदतीचा हात; ४२ मुलांच्या भवितव्यासाठी राजहंस परिवाराची धडपड.

अशोक इंगळे /सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागात तमासगीर कलावंतांची संख्या जास्त. पोटाची खळगी भरण्यासाठी या गावावरून त्या गावावर आपलं बिर्‍हाड दररोज हलविणारा कलावंत हा स्वत:च्या मुलाचं शिक्षण कोठे चालू आहे, त्यांना शिक्षण मिळते का, शिक्षण घेताना इतर मुले त्यांना जवळ घेतात का, याची किंचितही कल्पना त्यांना नसते. ही बाब ओळखून येळंब जि. बीड येथील राजहंस परिवाराने ४२ कलावंतांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तमासगीर कलावंतांच्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी राजहंस परिवाराची धडपड पाहून येथील लोकजागर परिवाराने मदतीचा हात पुढे केला आहे. तमासगीर कलावंत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या गावावरुन त्या गावावर जात असतात. त्यामुळे तमासगीर कलावंतांची मुले शिक्षणापासून वंचितच राहतात. त्यासाठी येळंब जि. बीड येथील सुरेश राजहंस व मयूरी राजहंस परिवाराने ४२ कलावंतांच्या मुलांना शिक्षणाची सोय केली आहे. त्यामुळे सायंदेव ता. सिंदखेडराजा येथे लोकजागर परिवाराच्यावतीने सुरेश व मयूरी राजहंस यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान करताना वह्या, पुस्तके व रोख १३ हजार रुपयांची मदत त्यांना सुपूर्द करण्यात आली आहे. तमाशा कलावंतांशी संपर्क साधून मुलांच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केला की अंगावर काटा उभा राहतो. तुमच्या मुलांचे भवितव्य आम्ही घडविणार, तुमची मुलं आमच्या पदरात घाला, अशी मायेची हाक राजहंस यांनी प्रत्येक फडावर जाऊन दिली. त्याला प्रतिसादही मिळाला. एक-एक करीत ४२ मुलं त्यांना मिळाली. शासनाची कोणतीही मदत मिळत नसताना हा भार लोकसहभागातून त्यांनी उचलला. एक खारीचा वाटा म्हणून लोकजागर परिवाराने त्यांना केली, असे मनोगत प्रवीण गीते यांनी मांडले. याहीपुढे अशा समाजसेवी कार्यात लोकजागर परिवार नेहमी सहभागी राहील, असेही त्यांनी सांगितले.