शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

गणरायाचे आगमन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:00 IST

चिंब पावसात ढोल- ताशांच्या निनादात जिल्हय़ात श्री  गणरायाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस  झाल्यामुळे चिंब पावसात गणेश भक्तांनी वाजत - गाजत मिरवणूक  काढत श्री गणेशाची स्थापना केली. जिल्हय़ात एकूण ९४३  सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून,  यामध्ये शहरी भागात ३८५ तर ग्रामीण भागात ५५८ मंडळांनी श्री  गणेशाची स्थापना केली आहे. 

ठळक मुद्देपावसामुळे गणेश उत्सवात आले चैतन्य!२४८ गावात ‘एक गाव-एक गणपती’

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  चिंब पावसात ढोल- ताशांच्या निनादात जिल्हय़ात श्री  गणरायाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस  झाल्यामुळे चिंब पावसात गणेश भक्तांनी वाजत - गाजत मिरवणूक  काढत श्री गणेशाची स्थापना केली. जिल्हय़ात एकूण ९४३  सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून,  यामध्ये शहरी भागात ३८५ तर ग्रामीण भागात ५५८ मंडळांनी श्री  गणेशाची स्थापना केली आहे.   o्री गणेशाच्या आगमनाची एका आठवड्यापासून जोरदार तयारी  सुरू होती. बुलडाणा शहरासह जिल्हय़ातील सर्व बाजारपेठा  सजल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच बुलडाणा शहरातील  बाजारात भाविकांची गणेश मूर्तीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.  त्यानंतर सायंकाळी गणेश मंडळांनी मिरवणूक काढत श्री गणेशाची  स्थापना केली. गणेश भक्तांमध्ये दिवसभर उत्साह दिसत होता.  अनेक गणेश भक्तांनी एक दिवस अगोदर गणेश मूर्तींची खरेदी  केली, तरी शुक्रवारी सकाळपासूनच बुलडाणा आठवडी बाजारा तील महात्मा फुले चौक, कारंजा चौक, बाजार लाइन, आठवडी  बाजार मार्ग आदी परिसरात गणेशमूर्ती आणि पूजाअर्चा साहित्याची  खरेदी करण्यासाठी आबालवृद्ध भाविकांची वर्दळ होती. शहरा तील बाजारपेठ विविध फुलांच्या दुकानांनी सजली असल्याने  सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता. गणेशमूर्ती घेऊन जाताना  गणेशभक्त गणपती बाप्पा मोरया, अशा जोशामध्ये जयजयकार  करीत असल्याने वातावरण प्रफुल्लित झाले होते.   जिल्हय़ात या धार्मिक वातावरणात शांतता राखण्यासाठी  जिल्ह्याभरात  पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस  अधिकारी,  पोलीस कर्मचार्‍यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.  रात्री १0 वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांकडून मूर्ती स्थापना  करण्यात आली. 

पावसामुळे गणेश उत्सवात आले चैतन्य!यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाने दांडी  दिली. त्यामुळे जिल्हय़ातील सोयाबीन, तुरीसह अन्य पिके धोक्यात  आली होती. त्यामुळे यावर्षी पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लाग तो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र गत चार  दिवसांपासून जिल्हय़ात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांना  संजीवनी मिळाली आहे. पावसाने दांडी दिल्याने सर्वत्र नैराश्याचे  वातावरण होते. तसेच आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा  सामना करावा लागेल, अशी चिंता होती; मात्र या पावसामुळे  सर्वांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. गणेशाच्या स्थापनेदरम्यान  पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.   

२४८ गावात ‘एक गाव-एक गणपती’जिल्ह्यातील ‘एक गाव-एक गणपती’ या संकल्पनेतून २४८ गावा त एक गाव-एक गणपती बसविण्यात आला. सामाजिक सलोखा  आणि सर्वधर्म समभाव गावात कायम राहावा याकरिता तंटामुक्त  मोहीम व पोलीस प्रशासनाच्यावतीने एका गावात एकच  सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले  होते. याला २४८ गावातील नागरिकांनी प्रतिसाद देत एकच  सार्वजनिक गणपती बसविला.