शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:23 IST

शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे; परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडल्याने खामगाव तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढले, मात्र पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा मिळताना दिसत नाही. एकीकडे प्रकल्पांमध्ये पाणी आहे, मात्र अद्याप शेतापर्यंत पोहचले नसल्याचे दिसून येते. सिंचनासाठी पाण्यासोबतच वीजेचाही प्रश्न आहे. रात्रीच्या वेळी वीज सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना थंडीत ओलीत करावे लागते. महावितरणने दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.गत काही वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने खामगाव परिसरातील सर्वच प्रकल्पांमधील पाणी पातळी घटली होती. जिथे पिण्याच्या पाण्याचीच टंचाई आहे; तिथे सिंचनाला पाणी मिळणे कठीण होऊन बसले होते. मात्र यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. खामगाव तालुक्यातील पावसाची सरासरी ६४० मिलीमिटर एवढी आहे. परंतु गत काही वर्षांपासून केवळ निम्मेच पाऊस पडत होता. यावर्षी मात्र ८२४ मिलीमीटर एवढा म्हणजेच तब्बल दीडपट पाऊस पडला. परिणामी यावर्षी पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न मिटला. परंतु शेतकºयांच्या बांधापर्यंत अजुनपर्यंत पाणी पोहचलेले दिसत नाही. खामगाव तालुक्यात यावर्षी रब्बीचा पेरा वाढला आहे. सुमारे २८ हजार हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यात हरभरा, गहू, कांदा, व मका पिकांचा समावेश आहे. यावर्षी विहीरींचीही पाणी पातळी बºयापैकी वाढल्याने सर्वच पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे. परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.पाटचºयांची स्वच्छता, दुरूस्तीची कामे प्रलंबित असल्यामुळे शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकलेले नाही. खामगाव तालुक्यात मन आणि मस या प्रकल्पांमधून शेतकºयांच्या शेतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. तर तोरणा व ज्ञानगंगा प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्यात येते. यानंतर शेतकरी नदीत मोटारी बसवून पाण्याचा उपसा करतात. दरम्यान मन व मस या प्रकल्पातून आतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे रब्बीच्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याचे दिसून येते. सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी सोडण्याची त्वरीत व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. वीज उपलब्ध करून द्या!एकीकडे प्रकल्पांमधून शेतापर्यंत पाणी पोहचले नाही, तर दुसरीकडे वीजेचीही समस्या आहे. अनेक भागात केवळ रात्रीच वीज पुरवठा सुरू करण्यात येत असल्याने शेतकºयांना रात्री थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. दुसरीकडे काही भागातील विद्यूत रोहित्रांचा प्रश्न आहे. काही रोहित्र बंद आहेत, तर काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतकºयांना रात्री ऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी तसेच रोहित्रांचाही प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पmahavitaranमहावितरण