शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:23 IST

शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे; परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडल्याने खामगाव तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढले, मात्र पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा मिळताना दिसत नाही. एकीकडे प्रकल्पांमध्ये पाणी आहे, मात्र अद्याप शेतापर्यंत पोहचले नसल्याचे दिसून येते. सिंचनासाठी पाण्यासोबतच वीजेचाही प्रश्न आहे. रात्रीच्या वेळी वीज सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना थंडीत ओलीत करावे लागते. महावितरणने दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.गत काही वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने खामगाव परिसरातील सर्वच प्रकल्पांमधील पाणी पातळी घटली होती. जिथे पिण्याच्या पाण्याचीच टंचाई आहे; तिथे सिंचनाला पाणी मिळणे कठीण होऊन बसले होते. मात्र यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. खामगाव तालुक्यातील पावसाची सरासरी ६४० मिलीमिटर एवढी आहे. परंतु गत काही वर्षांपासून केवळ निम्मेच पाऊस पडत होता. यावर्षी मात्र ८२४ मिलीमीटर एवढा म्हणजेच तब्बल दीडपट पाऊस पडला. परिणामी यावर्षी पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न मिटला. परंतु शेतकºयांच्या बांधापर्यंत अजुनपर्यंत पाणी पोहचलेले दिसत नाही. खामगाव तालुक्यात यावर्षी रब्बीचा पेरा वाढला आहे. सुमारे २८ हजार हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यात हरभरा, गहू, कांदा, व मका पिकांचा समावेश आहे. यावर्षी विहीरींचीही पाणी पातळी बºयापैकी वाढल्याने सर्वच पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे. परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.पाटचºयांची स्वच्छता, दुरूस्तीची कामे प्रलंबित असल्यामुळे शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकलेले नाही. खामगाव तालुक्यात मन आणि मस या प्रकल्पांमधून शेतकºयांच्या शेतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. तर तोरणा व ज्ञानगंगा प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्यात येते. यानंतर शेतकरी नदीत मोटारी बसवून पाण्याचा उपसा करतात. दरम्यान मन व मस या प्रकल्पातून आतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे रब्बीच्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याचे दिसून येते. सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी सोडण्याची त्वरीत व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. वीज उपलब्ध करून द्या!एकीकडे प्रकल्पांमधून शेतापर्यंत पाणी पोहचले नाही, तर दुसरीकडे वीजेचीही समस्या आहे. अनेक भागात केवळ रात्रीच वीज पुरवठा सुरू करण्यात येत असल्याने शेतकºयांना रात्री थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. दुसरीकडे काही भागातील विद्यूत रोहित्रांचा प्रश्न आहे. काही रोहित्र बंद आहेत, तर काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतकºयांना रात्री ऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी तसेच रोहित्रांचाही प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पmahavitaranमहावितरण