शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:23 IST

शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे; परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडल्याने खामगाव तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढले, मात्र पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा मिळताना दिसत नाही. एकीकडे प्रकल्पांमध्ये पाणी आहे, मात्र अद्याप शेतापर्यंत पोहचले नसल्याचे दिसून येते. सिंचनासाठी पाण्यासोबतच वीजेचाही प्रश्न आहे. रात्रीच्या वेळी वीज सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना थंडीत ओलीत करावे लागते. महावितरणने दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.गत काही वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने खामगाव परिसरातील सर्वच प्रकल्पांमधील पाणी पातळी घटली होती. जिथे पिण्याच्या पाण्याचीच टंचाई आहे; तिथे सिंचनाला पाणी मिळणे कठीण होऊन बसले होते. मात्र यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. खामगाव तालुक्यातील पावसाची सरासरी ६४० मिलीमिटर एवढी आहे. परंतु गत काही वर्षांपासून केवळ निम्मेच पाऊस पडत होता. यावर्षी मात्र ८२४ मिलीमीटर एवढा म्हणजेच तब्बल दीडपट पाऊस पडला. परिणामी यावर्षी पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न मिटला. परंतु शेतकºयांच्या बांधापर्यंत अजुनपर्यंत पाणी पोहचलेले दिसत नाही. खामगाव तालुक्यात यावर्षी रब्बीचा पेरा वाढला आहे. सुमारे २८ हजार हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यात हरभरा, गहू, कांदा, व मका पिकांचा समावेश आहे. यावर्षी विहीरींचीही पाणी पातळी बºयापैकी वाढल्याने सर्वच पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे. परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.पाटचºयांची स्वच्छता, दुरूस्तीची कामे प्रलंबित असल्यामुळे शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकलेले नाही. खामगाव तालुक्यात मन आणि मस या प्रकल्पांमधून शेतकºयांच्या शेतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. तर तोरणा व ज्ञानगंगा प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्यात येते. यानंतर शेतकरी नदीत मोटारी बसवून पाण्याचा उपसा करतात. दरम्यान मन व मस या प्रकल्पातून आतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे रब्बीच्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याचे दिसून येते. सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी सोडण्याची त्वरीत व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. वीज उपलब्ध करून द्या!एकीकडे प्रकल्पांमधून शेतापर्यंत पाणी पोहचले नाही, तर दुसरीकडे वीजेचीही समस्या आहे. अनेक भागात केवळ रात्रीच वीज पुरवठा सुरू करण्यात येत असल्याने शेतकºयांना रात्री थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. दुसरीकडे काही भागातील विद्यूत रोहित्रांचा प्रश्न आहे. काही रोहित्र बंद आहेत, तर काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतकºयांना रात्री ऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी तसेच रोहित्रांचाही प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पmahavitaranमहावितरण