शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव विभागातून ठाकरे, पाटील यांचे अर्ज वैध

By admin | Updated: May 19, 2017 00:12 IST

पणन महासंघ संचालक मंडळ निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ११ जून रोजी होत असून या निवडणुकीत पणन व सहकारी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था मतदार संघ खामगाव विभागातून एका जागेसाठी राजेंद्र किसनराव ठाकरे वडगाव वाण व संग्रामपूर व प्रसेनजित किसनराव पाटील मडाखेड ता. जळगाव जामोद यांचे अर्ज वैध ठरले आहेत. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.ही निवडणूक सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडीसाठी असून खामगाव विभागातून मागच्या निवडणुकीत प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक मंडळ हे १७ जणांचे असून खामगाव विभागातून एका संचालकाची निवड केली जाते. यावेळी भाजपाचे राजेंद्र ठाकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने यावेळी पणन व सहकारी जिनिंग मतदार संघ खामगाव विभागातून विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील व राजेंद्र ठाकरे यांच्यात चुरस होण्याची शक्यता दिसत आहे. खामगाव विभागात या निवडणूकीसाठी एकुण १६ मतदार आहेत. शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा व चिखली असा बारा तालुका खरेदी विक्री संघाचे प्रत्येकी एक याप्रमाणे नामनिर्देशित केलेला प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे. तसेच जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली व मलकापूर येथील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थांचा प्रत्येकी प्रतिनिधी असे चार प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे, असे एकुण १६ मतदार या निवडणुकीत मतदान करतील. सन २००४ व सन २०११ अशा दोन्ही निवडणुकीत खामगाव विभागातून प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. त्यामुळे त्यांना पणन महासंघ संचालक म्हणून १३ वर्षाचा कालावधी मिळाला. यावेळी सुध्दा ही निवडणूक जिल्ह्यातील वरिष्ठ नेते एकत्रित येवून अविरोध करतील अशी प्रसेनजित पाटील यांना आशा आहे. अर्थात ३१ मे नंतरच याबाबतची स्थिती स्पष्ट होईल. अविरोधाची शक्यता कमीविद्यमान संचालक व काँग्रेस नेते प्रसेनजित पाटील आणि भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य राजेंद्र ठाकरे यांच्यामध्ये यावेळी चुरशीची लढत होईल अशी शक्यता आहे. कारण या दोघांपैकी कोणीही रिंगणातून माघार होईल सध्यातरी वाटत नाही. दोन्ही उमेदवारांची विजयाबाबतची चाचपणी सुरू आहे. विजयी होण्यासाठी नऊ मतांची गरज आहे. या नऊ मतांचे समीकरण मांडणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते या निवडणुकीबाबत एकमेकांशी कशी हात मिळवणी करतात. यावरच जय-पराजयाचे समीकरण राहणार आहे. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.