शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव विभागातून ठाकरे, पाटील यांचे अर्ज वैध

By admin | Updated: May 19, 2017 00:12 IST

पणन महासंघ संचालक मंडळ निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ११ जून रोजी होत असून या निवडणुकीत पणन व सहकारी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था मतदार संघ खामगाव विभागातून एका जागेसाठी राजेंद्र किसनराव ठाकरे वडगाव वाण व संग्रामपूर व प्रसेनजित किसनराव पाटील मडाखेड ता. जळगाव जामोद यांचे अर्ज वैध ठरले आहेत. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.ही निवडणूक सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडीसाठी असून खामगाव विभागातून मागच्या निवडणुकीत प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक मंडळ हे १७ जणांचे असून खामगाव विभागातून एका संचालकाची निवड केली जाते. यावेळी भाजपाचे राजेंद्र ठाकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने यावेळी पणन व सहकारी जिनिंग मतदार संघ खामगाव विभागातून विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील व राजेंद्र ठाकरे यांच्यात चुरस होण्याची शक्यता दिसत आहे. खामगाव विभागात या निवडणूकीसाठी एकुण १६ मतदार आहेत. शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा व चिखली असा बारा तालुका खरेदी विक्री संघाचे प्रत्येकी एक याप्रमाणे नामनिर्देशित केलेला प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे. तसेच जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली व मलकापूर येथील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थांचा प्रत्येकी प्रतिनिधी असे चार प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे, असे एकुण १६ मतदार या निवडणुकीत मतदान करतील. सन २००४ व सन २०११ अशा दोन्ही निवडणुकीत खामगाव विभागातून प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. त्यामुळे त्यांना पणन महासंघ संचालक म्हणून १३ वर्षाचा कालावधी मिळाला. यावेळी सुध्दा ही निवडणूक जिल्ह्यातील वरिष्ठ नेते एकत्रित येवून अविरोध करतील अशी प्रसेनजित पाटील यांना आशा आहे. अर्थात ३१ मे नंतरच याबाबतची स्थिती स्पष्ट होईल. अविरोधाची शक्यता कमीविद्यमान संचालक व काँग्रेस नेते प्रसेनजित पाटील आणि भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य राजेंद्र ठाकरे यांच्यामध्ये यावेळी चुरशीची लढत होईल अशी शक्यता आहे. कारण या दोघांपैकी कोणीही रिंगणातून माघार होईल सध्यातरी वाटत नाही. दोन्ही उमेदवारांची विजयाबाबतची चाचपणी सुरू आहे. विजयी होण्यासाठी नऊ मतांची गरज आहे. या नऊ मतांचे समीकरण मांडणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते या निवडणुकीबाबत एकमेकांशी कशी हात मिळवणी करतात. यावरच जय-पराजयाचे समीकरण राहणार आहे. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.