शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खामगाव विभागातून ठाकरे, पाटील यांचे अर्ज वैध

By admin | Updated: May 19, 2017 00:12 IST

पणन महासंघ संचालक मंडळ निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ११ जून रोजी होत असून या निवडणुकीत पणन व सहकारी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था मतदार संघ खामगाव विभागातून एका जागेसाठी राजेंद्र किसनराव ठाकरे वडगाव वाण व संग्रामपूर व प्रसेनजित किसनराव पाटील मडाखेड ता. जळगाव जामोद यांचे अर्ज वैध ठरले आहेत. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.ही निवडणूक सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडीसाठी असून खामगाव विभागातून मागच्या निवडणुकीत प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक मंडळ हे १७ जणांचे असून खामगाव विभागातून एका संचालकाची निवड केली जाते. यावेळी भाजपाचे राजेंद्र ठाकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने यावेळी पणन व सहकारी जिनिंग मतदार संघ खामगाव विभागातून विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील व राजेंद्र ठाकरे यांच्यात चुरस होण्याची शक्यता दिसत आहे. खामगाव विभागात या निवडणूकीसाठी एकुण १६ मतदार आहेत. शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा व चिखली असा बारा तालुका खरेदी विक्री संघाचे प्रत्येकी एक याप्रमाणे नामनिर्देशित केलेला प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे. तसेच जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली व मलकापूर येथील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थांचा प्रत्येकी प्रतिनिधी असे चार प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे, असे एकुण १६ मतदार या निवडणुकीत मतदान करतील. सन २००४ व सन २०११ अशा दोन्ही निवडणुकीत खामगाव विभागातून प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. त्यामुळे त्यांना पणन महासंघ संचालक म्हणून १३ वर्षाचा कालावधी मिळाला. यावेळी सुध्दा ही निवडणूक जिल्ह्यातील वरिष्ठ नेते एकत्रित येवून अविरोध करतील अशी प्रसेनजित पाटील यांना आशा आहे. अर्थात ३१ मे नंतरच याबाबतची स्थिती स्पष्ट होईल. अविरोधाची शक्यता कमीविद्यमान संचालक व काँग्रेस नेते प्रसेनजित पाटील आणि भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य राजेंद्र ठाकरे यांच्यामध्ये यावेळी चुरशीची लढत होईल अशी शक्यता आहे. कारण या दोघांपैकी कोणीही रिंगणातून माघार होईल सध्यातरी वाटत नाही. दोन्ही उमेदवारांची विजयाबाबतची चाचपणी सुरू आहे. विजयी होण्यासाठी नऊ मतांची गरज आहे. या नऊ मतांचे समीकरण मांडणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते या निवडणुकीबाबत एकमेकांशी कशी हात मिळवणी करतात. यावरच जय-पराजयाचे समीकरण राहणार आहे. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.