शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

खामगाव विभागातून ठाकरे, पाटील यांचे अर्ज वैध

By admin | Updated: May 19, 2017 00:12 IST

पणन महासंघ संचालक मंडळ निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ११ जून रोजी होत असून या निवडणुकीत पणन व सहकारी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था मतदार संघ खामगाव विभागातून एका जागेसाठी राजेंद्र किसनराव ठाकरे वडगाव वाण व संग्रामपूर व प्रसेनजित किसनराव पाटील मडाखेड ता. जळगाव जामोद यांचे अर्ज वैध ठरले आहेत. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.ही निवडणूक सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडीसाठी असून खामगाव विभागातून मागच्या निवडणुकीत प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक मंडळ हे १७ जणांचे असून खामगाव विभागातून एका संचालकाची निवड केली जाते. यावेळी भाजपाचे राजेंद्र ठाकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने यावेळी पणन व सहकारी जिनिंग मतदार संघ खामगाव विभागातून विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील व राजेंद्र ठाकरे यांच्यात चुरस होण्याची शक्यता दिसत आहे. खामगाव विभागात या निवडणूकीसाठी एकुण १६ मतदार आहेत. शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा व चिखली असा बारा तालुका खरेदी विक्री संघाचे प्रत्येकी एक याप्रमाणे नामनिर्देशित केलेला प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे. तसेच जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली व मलकापूर येथील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थांचा प्रत्येकी प्रतिनिधी असे चार प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे, असे एकुण १६ मतदार या निवडणुकीत मतदान करतील. सन २००४ व सन २०११ अशा दोन्ही निवडणुकीत खामगाव विभागातून प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. त्यामुळे त्यांना पणन महासंघ संचालक म्हणून १३ वर्षाचा कालावधी मिळाला. यावेळी सुध्दा ही निवडणूक जिल्ह्यातील वरिष्ठ नेते एकत्रित येवून अविरोध करतील अशी प्रसेनजित पाटील यांना आशा आहे. अर्थात ३१ मे नंतरच याबाबतची स्थिती स्पष्ट होईल. अविरोधाची शक्यता कमीविद्यमान संचालक व काँग्रेस नेते प्रसेनजित पाटील आणि भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य राजेंद्र ठाकरे यांच्यामध्ये यावेळी चुरशीची लढत होईल अशी शक्यता आहे. कारण या दोघांपैकी कोणीही रिंगणातून माघार होईल सध्यातरी वाटत नाही. दोन्ही उमेदवारांची विजयाबाबतची चाचपणी सुरू आहे. विजयी होण्यासाठी नऊ मतांची गरज आहे. या नऊ मतांचे समीकरण मांडणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते या निवडणुकीबाबत एकमेकांशी कशी हात मिळवणी करतात. यावरच जय-पराजयाचे समीकरण राहणार आहे. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.