शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पश्चिम विदर्भातील २२ लाख दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:34 IST

बुलडाणा: दुष्काळाची दाहकता वाढलेली असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव व्यापाºयांनी गगनाला भिडवले आहेत.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: दुष्काळाची दाहकता वाढलेली असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव व्यापाºयांनी गगनाला भिडवले आहेत. दोन महिन्यात ढेपीच्या ६० किलोच्या पोत्यामागे सुमारे ७०० रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने पश्चिम विदर्भातील २२ लाख ५० हजार दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाºयावर भागवली जात आहे. परिणामी दुग्धोत्पादनालाही फटका बसत आहे. दुभत्या जनावरांच्या खाद्यपदार्थाकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढण्यासाठी मोठा फायदा होतो. त्यामध्ये प्रथिनेयुक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गायी, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतू सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहेत. दुधाळ जनावरांसाठी सर्वात जास्त सरकीच्या ढेपची विक्री पश्चिम वºहाडात होते. पशुखाद्य शास्त्रानुसार दुभत्या जनावरांना खुराक म्हणून सरकीची ढेप दिवसाकाठी एक ते दीड किलो देणे आवश्यक असते. सरकीची ढेप दुधाळ जनावरांना दिल्यास दुधात वाढ होऊन गुरांची भूकही चांगल्या प्रकारे भागविल्या जाते.  त्यासाठी खामगाव येथे तयार होणारी ढेप सर्वत्र प्रसिद्ध असून खामगाव येथून जिल्ह्याबाहेरही ढेपची निर्यात केली जाते. फेब्रुवारीमध्ये ढेपीच्या ६० किलोच्या एका पोत्यासाठी १२०० रुपये मोजावे लागत होते. मात्र गत दोन महिन्यात यामध्ये ७०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या ढेपीच्या ६० किलोच्या एका पोत्यासाठी १ हजार ९०० रुपये लागत आहेत. तर हिरवा चाराही दुधाळ जनावरांना देणे अवघड झाले आहे. याचा परिणाम म्हणून मिळणारे दूधही कमी झाल्याचे दिसून येते.  यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक गायी-म्हशीअमरावती विभागामध्ये एकूण २२ लाख ५० हजार ५० गायी व म्हशींची संख्या आहे. त्यामध्ये सर्वाधिक गायी-म्हशी यवतमाळ जिल्ह्यात दिसून येतात. यवतमाळमध्ये एकूण ६ लाख ८८ हजार ५०० त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार ७३३ गायी-म्हशींची संख्या आहे. अमरावती जिल्ह्यात ५ लाख १२ हजार ६०, अकोला जिल्ह्यात २ लाख ४० हजार १९५ व वाशिम जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ५६२ गायी-म्हशी आहेत.  बोंडअळीचा डंख सरकीच्या ढेपेवरमागीलवर्षी कापरीवर पडलेल्या बोंडअळीचा डंख सरकीच्या ढेपे दिसून येत आहे. राज्यात गतवर्षी ४२ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत बीटी कापसाची लागवड करण्यात आली होती. त्यात २० जिल्ह्यांत बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने सुमारे ५ लाखावर शेतकºयांचे नुकसान झाले होते. बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले परिणामी सरकीच्याही उत्पादनावर फटका बसला. सरकीची आवक कमी झाल्याने सरकीच्या ढेपेचे भाव वाढले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा