शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अमडापूर ते मेडसिंगा रस्त्याचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:47 IST

अमडापूर लगत मेडसिंगा, धोत्रा नाईक, किन्ही नाईकसह काही छोटी गावे आहेत. मात्र या गावांना जाण्यासाठी अजूनपर्यंत चांगला ...

अमडापूर लगत मेडसिंगा, धोत्रा नाईक, किन्ही नाईकसह काही छोटी गावे आहेत. मात्र या गावांना जाण्यासाठी अजूनपर्यंत चांगला रस्ता नसल्याने या गावांना कोणत्याही प्रकारचे वाहन जाऊ शकत नव्हते. शासनाची कुठलीही बस जात नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही येथे बस येत नव्हती. प्रकरणी मेडसिंगा येथील सरपंचांनी अनेक वेळा शासनाकडे रस्ता व बसची मागणी केली. यामुळे गावात जाण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून २ कोटी ५१ हजार रुपये किमतीचा रस्ता मंजूर केला. त्या रस्त्याचे खडीकरण होऊन, आता डांबरीकरणाचे काम ठेकेदाराकडून दिवस व रात्री करण्यात येत होते. मात्र रस्त्याचा योग्य दर्जा राखल्या जात नव्हता. याबाबत संबंधितांना कल्पना देऊनही त्यास फरक पडला नाही. प्रकरणी अमडापूर येथील शेतकरी व स्थानिकांनी याची माहिती अकोला बियाणे महामंडळ संचालक वल्लभराव देशमुख यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली तेव्हा रस्त्याच्या दर्जाबाबत त्यांना शंका आल्या. या कामाची नंतर संजय गवई, ग्रामपंचायत सदस्य दिलीप देशमुख, शिवाजी गायकवाड, प्रकाश खराडे यांनीही पाहणी केली व दर्जेदार रस्त्याची मागणी करत हे काम बंद पाडले.