शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

तालुक्यातील सर्व महा-ई सेवा केंद्र बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:26 IST

शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्‍या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात्र  या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने महा-ई सेवा केंद्रचालकांनी १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे

ठळक मुद्देविकेंद्रीकरण विरोधात महा-ई सेवा केंद्रचालक संपावर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्‍या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात्र  या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महा-ई सेवा केंद्रचालकांनी १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शासनाची ध्येय धोरण, लोकहितकारी विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याठी सरकारने २00८ ला महा-ई सेवा  केंद्र सुरु केले होते. त्यावेळेस हजारो सुशिक्षित बेकारांनी आपल्याकडील जमीन-दागिने, तर वेळप्रसंगी कर्ज काढून स्वत: गुंतवणूक करुन सरकार नियुक्त महा-ई सेवा केंद्र सुरू करुन रोजगार सुरु केला; परंतु मध्यंतरीच्या काळात सरकार तथा नियुक्त आस्थापनेद्वारा प्रत्येक ग्रा.पं. मध्ये सरकारी खर्चाने ‘संग्राम’ उभारणी व अर्जदाराची कोणतीही चौकशी न करता एकाच गावात डिजिटल सेवा केंद्र मोफत वाटण्यात आले. महा-ई सेवा केंद्रातून मिळणार्‍या सर्व सुविधा वरील संदर्भान्वये या संग्राम आणि सी.एस.सी. केंद्रांनाही दिल्याने एकाच गावात मोठय़ा प्रमाणात दुकानदारी सुरु झाली. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला होता. दरम्यान, या निवेदनाबाबत शासन स्तरावर अद्यापही दखल घेतल्या गेलेली नाही. नवीन धोरणानुसार २४ नोव्हेंबर रोजी सीएससी केंद्रांना महा-ई सेवा केंद्राच्या सर्व सेवा देण्याचा निर्णय प्रत्यक्षात अमलात येण्याची शक्यता असल्याने महा-ई सेवा केंद्रचालकांच्या मागणीबाबत तातडीने कारवाई अपेक्षित होती; मात्र तसे न झाल्याने आंदोलनात्मक पवित्रा घेत १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय संप पुकारला. परिणामी तालुक्यातील सर्व ३२ महा-ई सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेवाकेंद्रातून मिळणारे दाखले उपलब्ध न झाल्याने नागरिकांनादेखील गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शासनाने आमच्या मागणीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनोज गायकवाड, उध्दव थुट्टे पाटील, सुनील राठोड, नंदकिशोर गोडवे, मो.शहा, बनकर, राहुल खरात, शिवदास मोटे, शिवदास कापसे, विजय महाजन, गणेश सोळंकी, दीपक शेटे,  गजानन आखरे, इम्रान खान, पुरूषोत्तम पडघान, विनोद भगत आदी महा-ई-सेवा केंद्रचालकांनी केली आहे.