शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

तालुक्यातील सर्व महा-ई सेवा केंद्र बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:26 IST

शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्‍या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात्र  या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने महा-ई सेवा केंद्रचालकांनी १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे

ठळक मुद्देविकेंद्रीकरण विरोधात महा-ई सेवा केंद्रचालक संपावर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्‍या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात्र  या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महा-ई सेवा केंद्रचालकांनी १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शासनाची ध्येय धोरण, लोकहितकारी विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याठी सरकारने २00८ ला महा-ई सेवा  केंद्र सुरु केले होते. त्यावेळेस हजारो सुशिक्षित बेकारांनी आपल्याकडील जमीन-दागिने, तर वेळप्रसंगी कर्ज काढून स्वत: गुंतवणूक करुन सरकार नियुक्त महा-ई सेवा केंद्र सुरू करुन रोजगार सुरु केला; परंतु मध्यंतरीच्या काळात सरकार तथा नियुक्त आस्थापनेद्वारा प्रत्येक ग्रा.पं. मध्ये सरकारी खर्चाने ‘संग्राम’ उभारणी व अर्जदाराची कोणतीही चौकशी न करता एकाच गावात डिजिटल सेवा केंद्र मोफत वाटण्यात आले. महा-ई सेवा केंद्रातून मिळणार्‍या सर्व सुविधा वरील संदर्भान्वये या संग्राम आणि सी.एस.सी. केंद्रांनाही दिल्याने एकाच गावात मोठय़ा प्रमाणात दुकानदारी सुरु झाली. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला होता. दरम्यान, या निवेदनाबाबत शासन स्तरावर अद्यापही दखल घेतल्या गेलेली नाही. नवीन धोरणानुसार २४ नोव्हेंबर रोजी सीएससी केंद्रांना महा-ई सेवा केंद्राच्या सर्व सेवा देण्याचा निर्णय प्रत्यक्षात अमलात येण्याची शक्यता असल्याने महा-ई सेवा केंद्रचालकांच्या मागणीबाबत तातडीने कारवाई अपेक्षित होती; मात्र तसे न झाल्याने आंदोलनात्मक पवित्रा घेत १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय संप पुकारला. परिणामी तालुक्यातील सर्व ३२ महा-ई सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेवाकेंद्रातून मिळणारे दाखले उपलब्ध न झाल्याने नागरिकांनादेखील गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शासनाने आमच्या मागणीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनोज गायकवाड, उध्दव थुट्टे पाटील, सुनील राठोड, नंदकिशोर गोडवे, मो.शहा, बनकर, राहुल खरात, शिवदास मोटे, शिवदास कापसे, विजय महाजन, गणेश सोळंकी, दीपक शेटे,  गजानन आखरे, इम्रान खान, पुरूषोत्तम पडघान, विनोद भगत आदी महा-ई-सेवा केंद्रचालकांनी केली आहे.