शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

अकोला-खंडवा ब्रॉडगेज पर्यायी रेल्वे मार्गासाठी रेटा;  आ. सपकाळांचे विदर्भातील लोकप्रतिनिधींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:03 IST

बुलडाणा : मेळघाटमधून जाणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे संवर्धित पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार असून, शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच अवलंब करण्याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व आमदार व खासदारांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व लोकसभा सदस्यांना २९ जून रोजी पत्र लिहिले आहे.प्रस्तावित मेळघाट मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे.सर्वांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री व शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पर्यायी मार्गाचा अवलंब प्रकल्पासाठी व्हावा, अशी विनंती केली आहे.

बुलडाणा : मेळघाटमधून जाणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे संवर्धित पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार असून, शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच अवलंब करण्याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व आमदार व खासदारांना पत्राद्वारे केली आहे.काँग्रेसप्रणीत सरकारच्या काळात २००८ मध्ये मंजूर झालेल्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी मेळघाटऐवजी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने २०१५ मध्ये सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा विचार व्हावा, याबाबत पर्यावरणवादी व इतरांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, १८ जून रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या मागणीला केराची टोपली दाखवित प्रस्तावित मार्गानेच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय केंद्राच्या मंत्री गटाच्या समितीने घेतला आहे. यापूर्वीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळेच या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते यांनी आॅनलाइन याचिका दाखल केली असून, नागपूर खंडपिठातसुद्धा जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यानुषंगाने आ. सपकाळ यांनी यापूर्वीच राज्यपालांना पत्र लिहून निर्णयाबाबत पुनर्विचार व केंद्र सरकारकडे पर्यायी मार्गाची शिफारस करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व लोकसभा सदस्यांना २९ जून रोजी पत्र लिहिले आहे. त्यात मेळघाटमधून जाणाºया प्रस्तावित मार्गाऐवजी पर्यायी मार्ग व्यापक लोकहिताचा असल्याबाबत नमूद करून प्रस्तावित मेळघाट मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच ही जनभावना लक्षात घेता आपण सर्वांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री व शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पर्यायी मार्गाचा अवलंब प्रकल्पासाठी व्हावा, अशी विनंती केली आहे.

दिल्लीतील बैठकीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शुभेच्छा : सपकाळमानव विकास निर्देशांकात माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद या तालुक्यांच्या सर्वंकष विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणून ठरू शकणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वेच्या पर्यायी मार्गासाठी जिल्ह्याचा नागरिक म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये श्रेयवादाचा कुठेच प्रश्न येत नाही. संबंधित परिसराचे लोकप्रतिनिधी हे या महिन्यात दिल्लीत होणाºया बैठकीत हा प्रश्न मार्गी लावणार असतील, तर निश्चित आनंद आहे. त्यासाठी आपल्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत. दिल्लीतील बैठकीसाठी जर दोन्ही तालुक्यातील काही नागरिक उपस्थित राहू शकले, तर पारदर्शकतेच्या दृष्टीने ते अधिक उचित होईल, अशी पुस्तीही आ. सपकाळ यांनी या विषयासंदर्भात बोलताना जोडली. सत्ताधाºयांकडून मागणी पूर्ण न झाल्यास जनहितासाठी काँग्रेस पक्ष न्यायालयापासून रस्त्यावरील संघर्षापर्यंत तयार राहील, असे ही ते म्हणाले.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ