शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

अकोला-खंडवा ब्रॉडगेज पर्यायी रेल्वे मार्गासाठी रेटा;  आ. सपकाळांचे विदर्भातील लोकप्रतिनिधींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:03 IST

बुलडाणा : मेळघाटमधून जाणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे संवर्धित पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार असून, शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच अवलंब करण्याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व आमदार व खासदारांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व लोकसभा सदस्यांना २९ जून रोजी पत्र लिहिले आहे.प्रस्तावित मेळघाट मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे.सर्वांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री व शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पर्यायी मार्गाचा अवलंब प्रकल्पासाठी व्हावा, अशी विनंती केली आहे.

बुलडाणा : मेळघाटमधून जाणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे संवर्धित पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार असून, शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच अवलंब करण्याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व आमदार व खासदारांना पत्राद्वारे केली आहे.काँग्रेसप्रणीत सरकारच्या काळात २००८ मध्ये मंजूर झालेल्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी मेळघाटऐवजी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने २०१५ मध्ये सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा विचार व्हावा, याबाबत पर्यावरणवादी व इतरांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, १८ जून रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या मागणीला केराची टोपली दाखवित प्रस्तावित मार्गानेच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय केंद्राच्या मंत्री गटाच्या समितीने घेतला आहे. यापूर्वीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळेच या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते यांनी आॅनलाइन याचिका दाखल केली असून, नागपूर खंडपिठातसुद्धा जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यानुषंगाने आ. सपकाळ यांनी यापूर्वीच राज्यपालांना पत्र लिहून निर्णयाबाबत पुनर्विचार व केंद्र सरकारकडे पर्यायी मार्गाची शिफारस करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व लोकसभा सदस्यांना २९ जून रोजी पत्र लिहिले आहे. त्यात मेळघाटमधून जाणाºया प्रस्तावित मार्गाऐवजी पर्यायी मार्ग व्यापक लोकहिताचा असल्याबाबत नमूद करून प्रस्तावित मेळघाट मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच ही जनभावना लक्षात घेता आपण सर्वांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री व शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पर्यायी मार्गाचा अवलंब प्रकल्पासाठी व्हावा, अशी विनंती केली आहे.

दिल्लीतील बैठकीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शुभेच्छा : सपकाळमानव विकास निर्देशांकात माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद या तालुक्यांच्या सर्वंकष विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणून ठरू शकणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वेच्या पर्यायी मार्गासाठी जिल्ह्याचा नागरिक म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये श्रेयवादाचा कुठेच प्रश्न येत नाही. संबंधित परिसराचे लोकप्रतिनिधी हे या महिन्यात दिल्लीत होणाºया बैठकीत हा प्रश्न मार्गी लावणार असतील, तर निश्चित आनंद आहे. त्यासाठी आपल्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत. दिल्लीतील बैठकीसाठी जर दोन्ही तालुक्यातील काही नागरिक उपस्थित राहू शकले, तर पारदर्शकतेच्या दृष्टीने ते अधिक उचित होईल, अशी पुस्तीही आ. सपकाळ यांनी या विषयासंदर्भात बोलताना जोडली. सत्ताधाºयांकडून मागणी पूर्ण न झाल्यास जनहितासाठी काँग्रेस पक्ष न्यायालयापासून रस्त्यावरील संघर्षापर्यंत तयार राहील, असे ही ते म्हणाले.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ