शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी ग्रामपंचायतींना ३.१५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

By admin | Updated: May 26, 2017 20:10 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील विविध गावात असणारी पाणीटंचाई, निसर्गाचे बिघडलेले चक्र यास मानवाकडून मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड कारणीभूत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील विविध गावात असणारी पाणीटंचाई, निसर्गाचे बिघडलेले चक्र यास मानवाकडून मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड कारणीभूत आहे. यासाठी राज्य शासनाने सन २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, यावर्षी जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३ लाख १५ हजाराचे उद्दिष्ट दिले आहे.राज्यात २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, या वर्षी कोटीचे उद्दिष्ट राज्याचे आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला यंदा ८.५२ लक्ष वृक्ष लागवड करावी लागणार आहे. या मध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्हयातील ८५९ ग्राम पंचायतींना ३.१५ लाख इतके देण्यात आले आहे. तर वनीकरण सामाजिक वनीकरणचा यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग राहणार आहे.जिल्ह्यात होणाऱ्या वृक्षलागवडीमध्ये वन विभाग दोन लाख २८ हजार, सामाजिक वनीकरण एक लाख २८ हजार, कृषी विभाग ६८,५१२, नगर विकास विभाग १७ हजार, सार्वजनिक बांधकाम विभाग २ हजार, सहकार तथा वस्रोद्योग विभाग १० हजार, प्राथमिक शिक्षण विभाग ३२,८३०, माध्यमिक शिक्षण विभाग १० हजार ५९, गृह विभाग ५ हजार ५००, आदिवासी शाळा ६ हजार ७५०, सामाजिक न्याय विभाग १ हजार ४४५, जिल्हा आरोग्य अधिकारी बावन प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फंत १ हजार ४०४, जिल्हा शल्य चिकीत्सक १६ संस्थाद्वारा १ हजार ३००, महावितरण २ हजार ७००, अन्न औषधी प्रशासन १०३ दवाखांन्याद्वारा १६५, राज्य उत्पादन शुल्क विभाग ८००, कारागृह विभाग २००, राज्य परिवहन विभाग ७००, उप प्रादेशिक परिवहन विभाग ५०, विधी न्याय विभाग १५९, जि.प. सिंचन विभाग १ हजार ६००, पाटबंधारे ११,७००, कौशल्य विकास विभाग १३ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामार्फंत २ हजार, महसुल विभाग २ हजार ९००, बाल कल्याण विभाग दोन हजार ८६०, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग १२२ दवाखान्यामार्फत २ हजार ४२०, जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन ५ दवाखान्यांमार्फत २६०, जिल्हा कोषागार कार्यालय ५०, बीएसएनएल ५०, जिल्हा डाक कार्यालय २००, क्रीडा विभाग १०० ग्राम विकास विभाग ३ लाख १५ हजार वृक्षाचे रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.मागिलवर्षीचे ८२.६१ टक्के वृक्ष जिवंतमागीलवर्षी तीन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बुलडाणा जिल्ह्याला ३ लाख ५३ हजार ६३३ इतके उद्दिष्ट होते. जिल्ह्यात त्यानुसार झालेल्या वृक्षारोपणातील २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जगले आहेत.ज्याचे प्रमाण ८२.६१ टक्के आहे. सामाजिक वनीकरण लावलेल्या वृक्षांपैकी ९४.५६ टक्के वृक्ष जगले,वनविभागाचे ७५.१५ टक्के तर परिवहन विभाग क्रीडा विभागाचे ५६ टक्के पशुसंवर्धनने केलेले ५० टक्के वृक्ष जगले आहे.पर्यावरण टिकविण्याचे दृष्टीने वृक्ष लागवडीसाठी सर्वांनी सहकार्याची भुमिका ठेवावी व समाजात जनजागृती करून वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घ्यावा.- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी, बुलडाणा.