शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

यावर्षी ग्रामपंचायतींना ३.१५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

By admin | Updated: May 26, 2017 20:10 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील विविध गावात असणारी पाणीटंचाई, निसर्गाचे बिघडलेले चक्र यास मानवाकडून मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड कारणीभूत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील विविध गावात असणारी पाणीटंचाई, निसर्गाचे बिघडलेले चक्र यास मानवाकडून मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड कारणीभूत आहे. यासाठी राज्य शासनाने सन २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, यावर्षी जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३ लाख १५ हजाराचे उद्दिष्ट दिले आहे.राज्यात २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, या वर्षी कोटीचे उद्दिष्ट राज्याचे आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला यंदा ८.५२ लक्ष वृक्ष लागवड करावी लागणार आहे. या मध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्हयातील ८५९ ग्राम पंचायतींना ३.१५ लाख इतके देण्यात आले आहे. तर वनीकरण सामाजिक वनीकरणचा यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग राहणार आहे.जिल्ह्यात होणाऱ्या वृक्षलागवडीमध्ये वन विभाग दोन लाख २८ हजार, सामाजिक वनीकरण एक लाख २८ हजार, कृषी विभाग ६८,५१२, नगर विकास विभाग १७ हजार, सार्वजनिक बांधकाम विभाग २ हजार, सहकार तथा वस्रोद्योग विभाग १० हजार, प्राथमिक शिक्षण विभाग ३२,८३०, माध्यमिक शिक्षण विभाग १० हजार ५९, गृह विभाग ५ हजार ५००, आदिवासी शाळा ६ हजार ७५०, सामाजिक न्याय विभाग १ हजार ४४५, जिल्हा आरोग्य अधिकारी बावन प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फंत १ हजार ४०४, जिल्हा शल्य चिकीत्सक १६ संस्थाद्वारा १ हजार ३००, महावितरण २ हजार ७००, अन्न औषधी प्रशासन १०३ दवाखांन्याद्वारा १६५, राज्य उत्पादन शुल्क विभाग ८००, कारागृह विभाग २००, राज्य परिवहन विभाग ७००, उप प्रादेशिक परिवहन विभाग ५०, विधी न्याय विभाग १५९, जि.प. सिंचन विभाग १ हजार ६००, पाटबंधारे ११,७००, कौशल्य विकास विभाग १३ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामार्फंत २ हजार, महसुल विभाग २ हजार ९००, बाल कल्याण विभाग दोन हजार ८६०, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग १२२ दवाखान्यामार्फत २ हजार ४२०, जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन ५ दवाखान्यांमार्फत २६०, जिल्हा कोषागार कार्यालय ५०, बीएसएनएल ५०, जिल्हा डाक कार्यालय २००, क्रीडा विभाग १०० ग्राम विकास विभाग ३ लाख १५ हजार वृक्षाचे रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.मागिलवर्षीचे ८२.६१ टक्के वृक्ष जिवंतमागीलवर्षी तीन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बुलडाणा जिल्ह्याला ३ लाख ५३ हजार ६३३ इतके उद्दिष्ट होते. जिल्ह्यात त्यानुसार झालेल्या वृक्षारोपणातील २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जगले आहेत.ज्याचे प्रमाण ८२.६१ टक्के आहे. सामाजिक वनीकरण लावलेल्या वृक्षांपैकी ९४.५६ टक्के वृक्ष जगले,वनविभागाचे ७५.१५ टक्के तर परिवहन विभाग क्रीडा विभागाचे ५६ टक्के पशुसंवर्धनने केलेले ५० टक्के वृक्ष जगले आहे.पर्यावरण टिकविण्याचे दृष्टीने वृक्ष लागवडीसाठी सर्वांनी सहकार्याची भुमिका ठेवावी व समाजात जनजागृती करून वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घ्यावा.- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी, बुलडाणा.