शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Agriculture News : बियाणेकोंडीवर गुणनियंत्रकांचा वॉच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 11:11 IST

Agriculture News: बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद : गतवर्षी शेतकऱ्यांची बियाणेकोंडी झाली होती. अर्थात पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी दोन वर्षांत समोर आल्या. त्यामुळे आता ही बियाणे कोंडी थांबण्यासाठी कृषी विभागाने कृषी निविष्ठांची गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनातही बुलढाणा जिल्ह्याच्या सुमारे साडेसात लाख हेक्टरपैकी पावणेचार लाख हेक्‍टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.दोन वर्षांपूर्वी अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले, तर गतवर्षी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले होते. सदोष बियाणांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडून तक्रारी आल्या. बियाणेच न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र यातही बऱ्याच ठिकाणी वेळ निघून गेल्याने उत्पादनात घट झाली कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांची ही बियाणे कोंडी थांबण्यासाठी कृषी निविष्ठांची गुणनियंत्रकामार्फत तपासणी करण्याची मोहीम आखली आहे.   

३८ गुणनियंत्रकांवर जबाबदारी  जिल्ह्यात बियाणांचे १,३८६,  रासायनिक खतांचे १,३९६ व कीटकनाशकांचे १.३४० परवानाधारक वितरक आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग मिळून  ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नेमण्यात आले आहेत. यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रक, मोहीम अधिकारी,  कृषी  विकास अधिकारी,  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.   येत्या हंगामासाठी कृषी केंद्रांवरील बियाणांचे १,०६०, रासायनिक खतांचे ६२३ व कीटकनाशकांचे २१५ नमुने काढण्याचे लक्ष्यांक निर्धारित करण्यात आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीJalgaon Jamodजळगाव जामोद