शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा - अब्दुल सत्तार

By ब्रह्मानंद जाधव | Updated: April 10, 2023 18:47 IST

पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. 

बुलढाणा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विविध शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी यंत्रणांनी दोन दिवसात तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, यातून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

कृषिमंत्री सत्तार यांनी जिल्ह्यातील पीक नुकसानाची १० एप्रिल रोजी पाहणी केली. खामगाव तालुक्यातील चितोडा आणि अंबिकापूर, तसेच बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे भेट देऊन नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत खा. प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, दिलीपकुमार सानंदा आदी उपस्थित होते. 

नैसर्गिक संकटामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने एका पट्ट्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या भागात नुकसान झालेले नाही, अशा ठिकाणचे मनुष्यबळ नुकसान झालेल्या क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे गतीने पंचनामे होण्यास मदत होईल, कृषिमंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे सांगितले. 

यंत्रणांनी तातडीने पंचनामे करावेत. याचा अहवाल सादर झाल्यानंतर शासनाच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे होणे आवश्यक आहे. या पंचनाम्यापासून कोणताही शेतकरी सुटू नये, त्यानंतर शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाचे क्षेत्रफळ ठरवावे. नुकसानाचे सर्वेक्षण करताना नुकसान झालेल्या शेती पिकासह शेतकऱ्यांची घरे, जनावरे, झाडे, फळपिकांचे झालेले नुकसान पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात यावेत. यंत्रणांनी सर्वेक्षण योग्यरित्या करून शासनास अहवाल सादर करावा, अशा सुचनाही कृषी मंत्र्यांनी दिल्या.

शासकीय यंत्रणांनी हयगय केल्यास कारवाईशेतीमध्ये असलेले पीक आणि काढणीपश्चात शेतमालाचे नुकसान झाले असल्यास त्याचीही नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे नुकसानाची सर्वांगीण वस्तुनिष्ठ माहिती समोर यावी आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणांनी प्रत्येक शिवारात जाऊन सर्वेक्षण करावे, या कामात शासकीय यंत्रणांनी हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री सत्तार यांनी दिले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी