शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

शेती मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST

खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीची मशागत उरकुन घेणे गरजेचे आहे. उसनवार किंवा कर्जाऊ रक्कम घेऊन पेरणी केली आणि निसर्गाने ...

खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीची मशागत उरकुन घेणे गरजेचे आहे. उसनवार किंवा कर्जाऊ रक्कम घेऊन पेरणी केली आणि निसर्गाने साथ दिली, तरच रोजीरोटीचा भेडसावणारा प्रश्न सुटेल, या आशेपोटी बळीराजा शेतीची उन्हाळी मशागत करताना दिसत आहे. यामध्ये शेतीची नांगरट करून व फणपाळी करून पेरणीसाठी शेत तयार ठेवण्यासाठी धावपळ सुरू आहे. बागायती कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिबक संचाची दुरुस्ती पूर्ण केली आहे. आता शेती कपाशी लागवडीसाठी पूर्णपणे तयार झाली आहे.

कपाशीचा पेरा घटणार

बोंडअळीमुळे कपाशीचे अत्यल्प उत्पादन हाती येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. बोंडअळी नियंत्रणात आणण्यात कृषी विभागाला पाहिजे त्या प्रमाणात यश आलेले नाही. त्याच त्या उपाययोजना दरवर्षी सुचवण्यात येतात. मात्र त्याचा कुठलाही परिणाम होत नसल्याने उत्पादन घट होते. परिणामी उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने कपाशीचा पेरा घटण्याचे संकेत आहेत. त्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.