शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
2
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
3
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
4
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
5
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
7
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
8
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
9
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
10
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
11
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
12
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
13
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
14
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
15
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
16
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
18
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
19
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
20
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज

बुलडाणा जिल्ह्यात तुरीनंतर हरभरा खरेदीचाही वांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:38 AM

बुलडाणा : तुरीनंतर हरभ-याचीही हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी जिल्ह्यात नाफेड केंद्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीपाठोपाठ आता हरभरा खरेदीचाही वांधा निर्माण झाल्यामुळे शेतकºयांना आपला हरभरा व्यापाºयांना मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.

ठळक मुद्देनाफेड केंद्रावर हरभरा खरेदी बंदच मिळेल त्या भावात हरभरा विक्री!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तुरीनंतर हरभ-याचीही हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी बुलडाणा जिल्ह्यात नाफेड केंद्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीपाठोपाठ आता हरभरा खरेदीचाही वांधा निर्माण झाल्यामुळे शेतक-यांना आपला हरभरा व्यापा-यांना मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाने हमीभाव जाहीर केला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने शेतमालाची खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत जिल्ह्यात हरभ-याची खरेदी करण्यास अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. जागेअभावी अनेक ठिकाणी नाफेडकडून हरभºयाची खरेदी सुरू न झाल्याने हरभरा उत्पादक शेतकºयांना खासगी व्यापाºयांना मिळेल त्या दराने आपला माल विकावा लागत आहे. नाफेड केंद्रांतर्गत अनेक वेळा जिल्ह्यात तूर खरेदी बंद झाली. त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. यामुळे सुरुवातीपासून हमीभावाने तूर खरेदी करण्याच्या प्रक्रियेला सर्वच केंद्रांवर ग्रहण लागल्याने शेतकरी आपला माल हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. आता तुरीपाठोपाठ हरभरा खरेदीला नाफेड केंद्रावर सुरुवात करण्यात आली आहे. हरभºयासाठी ४ हजार ४०० रुपये हमीभाव ठेवण्यात आला असून, आतापर्यंत हजारो शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभही करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात हरभरा खरेदीला सुरुवात होत नसल्याचे चित्र आहे. महिनाभरापूर्वी हरभºयाची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु अद्यापपर्यंत शेतकरी हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या लग्न समारंभ सुरू असल्याने अनेक शेतकºयांना पैशाची गरज भासते; परंतु नाफेड केंद्रावर नोंदणी करूनही हरभरा खरेदी होत नसल्याने नाइलाजाने शेतकºयांना आपला माल खासगी व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे. परिणामी शासनाने जाहीर केलेल्या ४ हजार ४००  रुपयांच्या भावापेक्षा एक ते दीड  हजार रुपये कमी दराने बाजारात हरभरा खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

घाटावरील हरभरा खरेदी अनियमितघाटावरील तालुक्यातील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदीमध्ये अनियमितता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मेहकर येथील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदी सुरू करण्यात आली, तर सिंदखेडराजा तालुक्यातील नाफेड केंद्रावर २७ एप्रिल रोजी हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला; मात्र अद्यापही बुलडाणा, लोणार, चिखली, मोताळा व देऊळगावराजा येथील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदी बंद आहे. 

शुभारंभ नावालाच!जिल्ह्यातील काही नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदीचा केवळ शुभारंभ झाला असून, खरेदी केंद्र प्रत्यक्षात बंद असल्याचे चित्र आहे. बुलडाणा येथील नाफेड केंद्रावर २० एप्रिल रोजी थाटात हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला; मात्र गेल्या आठ दिवसांपासून येथे हरभरा खरेदी करण्यात आली नाही, त्यामुळे हा शुभारंभ केवळ नवालाच उरल्याचे चित्र दिसून येत आहे.

जागेचा ठरतोय अडसरनाफेड केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या मालाची साठवणूक करण्यासाठी जागेचा अभाव निर्माण होत असल्याने खरेदी केंद्र वारंवार बंद राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तुरीची खरेदीही जागेअभावी बंद करण्यात आली होती; आता पुन्हा हरभरा खरेदीसाठी जागेचा अडसर कळीचा मुद्दा बनत आहे. खरेदी झालेला माल साठविण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा