शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाजनादेश यात्रेपाठोपाठ आता जनआशीर्वाद यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:07 IST

शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील भाग पालथा घालणार आहेत.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: १४ व्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजण्यास सुरुवात झाली असून, राजकीय पक्षांनी त्यानुषंगाने वातावरण निर्मितीस प्रारंभ केला आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दोनदा जिल्ह्यात आली; मात्र दुर्दैवाने भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाल्याने केवळ यात्रेचा सोपस्कार आटोपण्यात आला. त्यामुळे जनादेश स्वीकारण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात पुन्हा येण्याबाबत आश्वस्त केले असतानाच २९ आॅगस्ट रोजी भाजप पाठोपाठ शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील भाग पालथा घालणार आहेत.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा कयास राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. अशा स्थितीत राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघातील गाठीभेटी, बैठका तेज केल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्राही काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली होती. तीही आता पुढील टप्प्यात जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे किंवा पुढील टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात किंवा समारोप हा मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत होण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यालगतच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शिवस्वराज्य यात्रेअंतर्गत मोठी सभा झाली. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे ही सभा १९ आॅगस्ट रोजी येणे अपेक्षित होते; मात्र ती काही कारणामुळे पुढे ढकलली होती.एकंदरीत आॅगस्ट महिना हा विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण निर्मिती करणारा ठरला आहे. प्रारंभी महाजनादेश यात्रा जिल्ह्यात येऊन गेली आता शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा येऊ घातली आहे. या दोन्ही यात्रांचे वैशिष्ट्य म्हणजे महाजनादेश यात्रा ही भाजपच्या ताब्यात असलेल्या मलकापूर, खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातूनच गेली. त्या पाठोपाठ आता शिवसेनेची युवा जनआशीर्वाद यात्रा जिल्ह्यात येत असली तरी घाटावरील बुलडाणा, चिखली आणि देऊळगाव राजा मार्गे जालना जिल्ह्यात जाणार आहे. यामध्ये चिखलीचा अपवाद वगळता सिंदखेड राजात शिवसेनेचे विद्यमान आमदार आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा चार वेळा विजय झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. एकंदरीत भाजपने भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातूनच महाजनादेश यात्रा काढली तर शिवसेना ज्या मतदारसंघावर हक्क सांगत आहे, त्या मतदारसंघातूनच जनआशीर्वाद यात्रा जात आहे. परिणामी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.३१ आॅगस्टला अंतिम मतदार यादीएकीकडे राजकीय यात्रांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच प्रशासकीय पातळीवर मतदार याद्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमही जोमात सुरू आहे. ३१ आॅगस्ट रोजी त्यानुषंगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारंभी १९ आॅगस्ट रोजी ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती; मात्र नंतर या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सध्या २ लाख ६७ हजार ते ३ लाख ९ हजारादरम्यान मतदार आहेत. अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर प्रत्यक्षात मतदारसंघनिहाय किती उमेदवार आहेत, हे स्पष्ट होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारणMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे