शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

जिगाव प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी हवीय भरघोस तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST

बुलडाणा : पश्चिम वऱ्हाडाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची ताकद असलेल्या जिगाव प्रकल्पावर चालू आर्थिक वर्षात ६८८ कोटी ५० लाख ...

बुलडाणा : पश्चिम वऱ्हाडाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची ताकद असलेल्या जिगाव प्रकल्पावर चालू आर्थिक वर्षात ६८८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला असला तरी हा प्रकल्प २०२५ च्या कालमर्यादेत पूर्णत्वात नेण्यासाठी दरवर्षी किमान १ हजार ९३० कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. मात्र, त्या तुलनेत यंदा अवघी ६९० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. जी की एकूण गरजेच्या तुलनेत अवघी ४१ टक्के आहे. विदर्भाचा सिंचन अनुशेष आणि त्यातल्या त्यात बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष पाहता राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलनाच्या निधी वाटपाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन जिगाव प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सुमारे १ लाख १० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाला कालमर्यादेत पूर्णत्वास नेण्यासाठी सलग तिसऱ्यांदा खासदार असलेले प्रतापराव जाधव आणि राज्याचे अन्न व अैाषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जोरकस प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दुसरीकडे २०१९-२० या आर्थिक वर्षातील केंद्र सरकारकडून हवा असलेला ६६ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी जलसंपदा विभागास यावर्षी प्राप्त झाला असला तरी जिगाव प्रकल्प व पुनर्वसन व भूसंपादनाच्या कामावर झालेल्या ६८८ कोटी ५० लाख रुपयांच्या झालेल्या खर्चाच्या तुलनेत केंद्र सरकारचा १७२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अद्याप अप्राप्त आहे. त्या अनुषंगाने १७२ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जून महिन्यात पाठविण्यात आला आहे.

--पुनर्वसन व भूसंपादनासाठीच हवे तीन हजार कोटी--

जिगाव प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी पुनर्वसन व भूसंपादनाच्या निर्माण झालेल्या जटिल समस्या मार्गी लावण्यासाठी जवळपास तीन हजार कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, हा प्रश्न आतापर्यंत प्राधान्याने हाताळला गेलेला नाही. त्यामुळे एकीकडे प्रकल्पात २०२४ पर्यंत अंशत: पाणी साठविण्याचे नियोजन केले जात असले तरी पुनर्वसन व भूसंपादनच मार्गी लागणार नसले तर पाणी साठविणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही बाब खु्द्द जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये बुलडाणा येथे झालेल्या बैठकीदरम्यान उपस्थित केली होती. आज प्रकल्पाची एकूण किंमत १३ हजार ८७४ कोटी ५४ लाखांच्या घरात गेलेली आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन जिगाव प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेची गरज आहे. त्यामुळे जिगाव प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शिवसेनेचे खा. प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न व अैाषध प्रशासन मंत्री यांनी आपला राजकीय जोर पणास लावण्याची गरज आहे.