शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी हवीय भरघोस तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST

बुलडाणा : पश्चिम वऱ्हाडाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची ताकद असलेल्या जिगाव प्रकल्पावर चालू आर्थिक वर्षात ६८८ कोटी ५० लाख ...

बुलडाणा : पश्चिम वऱ्हाडाचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची ताकद असलेल्या जिगाव प्रकल्पावर चालू आर्थिक वर्षात ६८८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला असला तरी हा प्रकल्प २०२५ च्या कालमर्यादेत पूर्णत्वात नेण्यासाठी दरवर्षी किमान १ हजार ९३० कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. मात्र, त्या तुलनेत यंदा अवघी ६९० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. जी की एकूण गरजेच्या तुलनेत अवघी ४१ टक्के आहे. विदर्भाचा सिंचन अनुशेष आणि त्यातल्या त्यात बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष पाहता राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलनाच्या निधी वाटपाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन जिगाव प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सुमारे १ लाख १० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाला कालमर्यादेत पूर्णत्वास नेण्यासाठी सलग तिसऱ्यांदा खासदार असलेले प्रतापराव जाधव आणि राज्याचे अन्न व अैाषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जोरकस प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दुसरीकडे २०१९-२० या आर्थिक वर्षातील केंद्र सरकारकडून हवा असलेला ६६ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी जलसंपदा विभागास यावर्षी प्राप्त झाला असला तरी जिगाव प्रकल्प व पुनर्वसन व भूसंपादनाच्या कामावर झालेल्या ६८८ कोटी ५० लाख रुपयांच्या झालेल्या खर्चाच्या तुलनेत केंद्र सरकारचा १७२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अद्याप अप्राप्त आहे. त्या अनुषंगाने १७२ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जून महिन्यात पाठविण्यात आला आहे.

--पुनर्वसन व भूसंपादनासाठीच हवे तीन हजार कोटी--

जिगाव प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी पुनर्वसन व भूसंपादनाच्या निर्माण झालेल्या जटिल समस्या मार्गी लावण्यासाठी जवळपास तीन हजार कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, हा प्रश्न आतापर्यंत प्राधान्याने हाताळला गेलेला नाही. त्यामुळे एकीकडे प्रकल्पात २०२४ पर्यंत अंशत: पाणी साठविण्याचे नियोजन केले जात असले तरी पुनर्वसन व भूसंपादनच मार्गी लागणार नसले तर पाणी साठविणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही बाब खु्द्द जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये बुलडाणा येथे झालेल्या बैठकीदरम्यान उपस्थित केली होती. आज प्रकल्पाची एकूण किंमत १३ हजार ८७४ कोटी ५४ लाखांच्या घरात गेलेली आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन जिगाव प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेची गरज आहे. त्यामुळे जिगाव प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शिवसेनेचे खा. प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न व अैाषध प्रशासन मंत्री यांनी आपला राजकीय जोर पणास लावण्याची गरज आहे.