शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अल्पभूधारक शेतकऱ्यास २९ हजारांचा आॅनलाइन गंडा

By admin | Updated: March 31, 2017 19:32 IST

मोताळा: येथील विनोद पुंडलीक गवळी या अल्पभूधारक शेतकऱ्यास स्टेट बँकेचा अधिकारी असल्याचे भासवत "एटीएम" वरील कोड विचारून आॅनलाइन २८ हजार ९९७ रुपए बँक खात्यातून काढून फसविल्याचा प्रकर उघडकीस आला.

अर्ध्या तासात चार वेळा काढले पैसेमोताळा: येथील विनोद पुंडलीक गवळी या अल्पभूधारक शेतकऱ्यास स्टेट बँकेचा अधिकारी असल्याचे भासवत "एटीएम"  वरील कोड विचारून आॅनलाइन २८ हजार ९९७ रुपए बँक खात्यातून काढून फसविल्याचा प्रकर उघडकीस आला. या प्रकरणी पीडित शेतकऱ्यांने बँकेच्या शाखेसह पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र शेतकऱ्याला कोणताही दिलासा मिळाला नाही.या बाबत अधिक माहिती अशी की,  पिंपळपाटी येथील शेतकरी विनोद पुंडलीक गवळी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. परिस्थिती जेमतेम असून, शेलापूर ता. मोताळा येथील भारतीय  स्टेट बँकेत त्यांचे बचत खाते आहे. ३० मार्च रोजी दुपारी पाऊन वाजता त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. मी मुंबईच्या बांद्रा हेडआॅफिसमधून रोहितकुमार शर्मा बोलतो आहे, तुमच्या एटीएमची मुदत संपली आहे. तुम्हाला मुदत वाढवून पाहिजे असल्यास रजिस्ट्रेशन करावे लागेल. असे सांगून त्यांने विनोद गवळी यांना रजिस्ट्रेशनसाठी एक हजार रूपय खर्च येईल. त्यासाठी तोतया व्यक्तीने गवळी यांना एटीएमचे मागील पुढील क्रमांक विचारले. हे क्रमांक घेतल्यावर तुम्हाला एक एसएमएस येईल असे सांगितले. थोड्यावेळाने एटीएमचा "ओटीपी" (आॅनलाईन ट्रान्झक्शन पावर्ड) विचारला. गवळी यांनी तोही क्रमांक दिला. ही सर्व माहिती संबंधित व्यक्तीने विश्वासात घेऊन विचारली. मोबाइल बंद झाल्यावर गवळी यांच्या खात्यातील ४ हजार ९९९ रुपए, ९ हजार ९९९, ९ हजार ९९९ व ४ हजार रुपए काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. मात्र गवळी यांनी मोबाइलवरील संदेश न पाहताच, शेलापूर शाखेत एटीएमची मुदत कशी संपली याबाबत चौकशी केली असता, तुमची एटीएमची मुदत संपली नाही मात्र तुमच्या खात्यातून २८ हजार ९९७ रुपए काढल्याचे शाखाधिकारी यांनी सांगितले. हा आॅनलाइन गंडविण्याचा प्रकार ऐकूण विनोद गवळी यांना धक्काच बसला. सदर शेतकऱ्याने नुकताच कापूस विकला असून, कुटुंबासाठी ज्वारी आदी धान्य खरेदी करण्यासाठी पैसे बँकेत ठेवले होते. आपली  फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर गवळी यांनी बोराखेडी पोलिस स्टेशन गाठले. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांनी ७४९१८६३६११ या तोतया व्यक्तीच्या मोबाइलवर संवाद साधून  धमकावले. सवांदादरम्यान तोतया व्यक्तीने थोड्यावेळात पैसे परत करतो असे सांगितले मात्र पैसे आले नाही. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक व व्यवहार तपासला असता, दिल्लीवरून हा प्रकार झाल्याचा अंदाज शेलापूर बँक शाखाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. या आॅनलाइन प्रकाराने शेतकऱ्यासमोर आभाळ कोसळले असून, आॅनलाईन फसवणुकीबाबत त्याला कोणताही दिलासा मिळाला नाही. पोलिसांक डूनही मदत मिळाली नसून या प्रकाराबाबत बँकेचे प्रशासनही हतबल असल्याचे दिसून आले.