शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पाणी उपसा करणा-यांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: November 20, 2015 02:27 IST

मेहकर तालुक्यात कोराडी प्रकल्प व तलावातून अवैधरीत्या पाणी उपसा.

मेहकर (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोराडी प्रकल्प व तलावातून मोठय़ा प्रमाणावर अवैधरीत्या पाणी उपसा सुरू असून, अवैध पाणी उपसा करणार्‍यांवर पोलीस कारवाई करण्याची मोहीम तहसील व पाटबंधारे विभागाने घेतली आहे. मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाझर तलाव व कोराडी मध्य प्रकल्पातून अवैधरीत्या पाणी उपसा सुरू असल्याच्या तक्रारी तहसीलदार, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग यांना मिळत असल्याने या अवैधरीत्या पाणी उपसा करणार्‍यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून नोटीससुद्धा बजावण्यात आल्या आहे. सर्रासपणे पाणी उपसा होत असल्याचे भविष्यात मोठय़ा प्रमाणावर भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने अवैधरीत्या पाणी उपसा करणार्‍याविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यातील देऊळगाव माळी, वरोडी, गुंज, शेलगाव काकडे, साखरखेर्डा, ब्रह्मपुरी, विवेकानंद नगर या ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिव यांना पत्र देऊन संबंधित अवैधरीत्या पाणी उपसा करणार्‍याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने पाझर तलाव, कोराडी मध्यम प्रकल्प आदीवरून पाणी उपसा संदर्भात कडक सूचना दिल्या असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हाधिकार्‍यांना सर्व अधिकार देण्यात आले आहे. आधी पिण्यासाठी पाणी राखून ठेवावे नंतरच सिंचनासाठी पाणी असे शासनाचे आदेश आहेत. मेहकर उपविभागातील एकूण २९ लघुप्रकल्प असून, त्यात अत्यंत कमी प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये कोराडी प्रकल्पात 0.८१ दलघमी म्हणजेच ५.३६ टक्के इतकाच जलसाठा राहिला आहे. तर घनवटपूर प्रकल्पात 0.३८ दलघमी, पळशी 0.३९ दलघमी, कळंबेश्‍वर 0.४५ दलघमी, जागदरी १.0८ दलघमी, चोरपांग्रा 0.१२ दलघमी, खंडाळा 0.२६ दलघमी, खळेगाव 0.३५ दलघमी, सावंगीमाळी एक 0.१७ दलघमी, टिटवी 0.८७ दलघमी, शिवणीजाट 0.१८ दलघमी, गंधारी 0.१८ दलघमी, पिंपळनेर 0.८७ दलघमी, देऊळगाव कुंडपाळ 0.0९ दलघमी, तांबोळा 0.३३ दलघमी, गुंधा १.१९ दलघमी, पिंपरखेड 0.२९ दलघमी, गारखेड 0.५४ दलघमी, तांदूळवाडी 0.६0 दलघमी, दुसरबीड 0.९९ दलघमी, देवखेड 0.८७ दलघमी, निमगाव वायाळ तलावात १.१६ दलघमी इतका कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच कळपविहिर, सावंगीमाळी दोन, अंभोरा, मांडवा, केशवशिवणी या प्रकल्पामधील पाणीसाठा मृत जलसाठय़ाखाली पोहचला आहे. तर चायगाव येथील तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे.