बुलडाणा, दि. १२- वातावरणात बदल होवून सर्वत्र उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीखालील पाण्याची पातळी घसरली असून, अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत मागणीनुसार पाणीटंचाईची तिव्रता असलेल्या जिल्ह्यातील ११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात ऑक्टोबर २0१६ ते जून २0१७ साठी पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६५0 गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यासाठी ७५५ उपाय योजनांचा समावेश होता. या उपाययोजनामध्ये ९८ विंधनविहरी व कुपनलिका घेणे, ४६ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, १८ तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, ३८ टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, ५५४ खाजगी विहीरन अधिगृहण करणे, १ विहिर खोल करणे किंवा गाळ काढणे या उपाययोजनांचा समावेश होता. याउपययोजनांसाठी ४७५.३0 लक्ष खर्च अपेक्षित असल्याचे कृती आराखड्यात नमूद करण्यात आले होते. सध्या मार्च महिना सुरू असल्यामुळे उन्हाची तिव्रता वाढत आहे. त्यामुळे अनेक गावात पाणीटंचाई जाणवत आहे. यासाठी पाणीटंचाईची अधिक तिव्रता लक्षात घेता आलेल्या प्रस्तावानुसार पाणीटंचाईच्या प्रस्तावित ६५0 गावापैकी ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ खाजगी विहिरी अधिगृहण करण्यात येणार आहे. येणार्या काळात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होणार असून उपाययोजनामध्येही वाढ होणार आहे.
टंचाईग्रस्त ११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण
By admin | Updated: March 13, 2017 02:25 IST