शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

बियाणे काठावर तर रासायनिक खते मुबलक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे व रासायनिक खतांपैकी आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे व रासायनिक खतांपैकी आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खतांची उपलब्ध आहे. मात्र, बियाणे नेमकी जितकी गरज आहे तितकेच उपलब्ध असल्याने दुबार अथवा तिबार पेरणीचे संकट ओढावल्यास मात्र, ऐनवेळी बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे.

तालुक्यात सुमारे ९० हजार हेक्टर लागवडीलायक क्षेत्र आहे. यापैकी सरासरी पेरणी क्षेत्र हे ८८ हजार ४२३ आहे. गतवर्षी ८८ हजार २९४ हेक्टरावर खरिपाचा पेरा झाला होता. दरम्यान, गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. या पृष्ठभूमीवर यंदा पावसाने तालुक्याची सरासरी गाठली तरी पाण्याची कमतरता जाणावणारी नसल्याने यंदाच्या हंगामात खरिपाच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाने यंदा ८८ हजार ६१० हेक्टरावर पेरणीचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील शेतकरी सोयाबीन या नगदी पिकालाच सर्वाधिक प्राधान्य देत असल्याने यंदाही एकूण लागवडी क्षेत्रापैकी तब्बल ६८ हजार हेक्टर ३८० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तर ११ हजार ५०० हेक्टरावर तूर, ३ हजार ८०० हेक्टरावर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मूग या प्रमुख पिकांना प्राधान्य राहणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी लागणारे बियाणे सद्य:स्थिती पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, ऐनवेळी पावसाने दगा दिल्यास अथवा बियाण्यांमध्ये उगवण क्षमता कमी आल्यास दुपार अथवा तिबार पेरणीची वेळ आल्यास ऐनवेळी मात्र, बियाण्यांची टंचाई उद्भवण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने यंदा खतांची टंचाई भासणार नाही.

२ हजार १९५ मे.टन खते लागणार

तालुक्यातील चिखली, अमडापूर, मेरा आणि शेलसूर या मंडळातील एकूण १३० गावांतील शेतकऱ्यांना सुमारे २ हजार १९५ मेट्रीक टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने कृषी विभागाने मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान, सुरुवातीला खतांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली होती. मात्र, आता वाढीव दरात केंद्राने कपात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

२९१.९० मे.टन बियाण्यांची आवश्यकता !

गतवर्षी लॉकडाऊनमुळे ऐनवेळी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर यंदा शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन या प्रमुख पिकासाठी घरचेच बियाणे वापरण्यावर भर दिला आहे. यासाठी सुमारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज भासणार आहे. सोयाबीनसह इतर बियाणे असे एकूण २९१.९० मे.टन बियाणे यंदा पेरणीसाठी लागणार आहे.

बांधावर खते व बियाणे वाटप !

कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता कृषी विभागाने खते व बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी कृषी विभागाने गुगल फॉर्म लिंक व व्हाॅटस्‌अ‍ॅपचा आधार घेतला असून याद्वारे शेतकऱ्यांनी बियाणे व खताची मागणी नोंदविल्यानंतर त्या गावातील शेतकऱ्यांचा एकत्रित गटाचे नियोजन करून गटप्रमुख व कृषी केंद्रधारकांच्या समन्वयाने शेतकऱ्यांना बांधावर अथवा द्वारपोच खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चदेखील वाचणार आहे.