शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे काठावर तर रासायनिक खते मुबलक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे व रासायनिक खतांपैकी आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे व रासायनिक खतांपैकी आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खतांची उपलब्ध आहे. मात्र, बियाणे नेमकी जितकी गरज आहे तितकेच उपलब्ध असल्याने दुबार अथवा तिबार पेरणीचे संकट ओढावल्यास मात्र, ऐनवेळी बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे.

तालुक्यात सुमारे ९० हजार हेक्टर लागवडीलायक क्षेत्र आहे. यापैकी सरासरी पेरणी क्षेत्र हे ८८ हजार ४२३ आहे. गतवर्षी ८८ हजार २९४ हेक्टरावर खरिपाचा पेरा झाला होता. दरम्यान, गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. या पृष्ठभूमीवर यंदा पावसाने तालुक्याची सरासरी गाठली तरी पाण्याची कमतरता जाणावणारी नसल्याने यंदाच्या हंगामात खरिपाच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाने यंदा ८८ हजार ६१० हेक्टरावर पेरणीचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील शेतकरी सोयाबीन या नगदी पिकालाच सर्वाधिक प्राधान्य देत असल्याने यंदाही एकूण लागवडी क्षेत्रापैकी तब्बल ६८ हजार हेक्टर ३८० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तर ११ हजार ५०० हेक्टरावर तूर, ३ हजार ८०० हेक्टरावर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मूग या प्रमुख पिकांना प्राधान्य राहणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी लागणारे बियाणे सद्य:स्थिती पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, ऐनवेळी पावसाने दगा दिल्यास अथवा बियाण्यांमध्ये उगवण क्षमता कमी आल्यास दुपार अथवा तिबार पेरणीची वेळ आल्यास ऐनवेळी मात्र, बियाण्यांची टंचाई उद्भवण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने यंदा खतांची टंचाई भासणार नाही.

२ हजार १९५ मे.टन खते लागणार

तालुक्यातील चिखली, अमडापूर, मेरा आणि शेलसूर या मंडळातील एकूण १३० गावांतील शेतकऱ्यांना सुमारे २ हजार १९५ मेट्रीक टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने कृषी विभागाने मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान, सुरुवातीला खतांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली होती. मात्र, आता वाढीव दरात केंद्राने कपात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

२९१.९० मे.टन बियाण्यांची आवश्यकता !

गतवर्षी लॉकडाऊनमुळे ऐनवेळी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर यंदा शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन या प्रमुख पिकासाठी घरचेच बियाणे वापरण्यावर भर दिला आहे. यासाठी सुमारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज भासणार आहे. सोयाबीनसह इतर बियाणे असे एकूण २९१.९० मे.टन बियाणे यंदा पेरणीसाठी लागणार आहे.

बांधावर खते व बियाणे वाटप !

कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता कृषी विभागाने खते व बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी कृषी विभागाने गुगल फॉर्म लिंक व व्हाॅटस्‌अ‍ॅपचा आधार घेतला असून याद्वारे शेतकऱ्यांनी बियाणे व खताची मागणी नोंदविल्यानंतर त्या गावातील शेतकऱ्यांचा एकत्रित गटाचे नियोजन करून गटप्रमुख व कृषी केंद्रधारकांच्या समन्वयाने शेतकऱ्यांना बांधावर अथवा द्वारपोच खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चदेखील वाचणार आहे.