शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नळगंगा प्रकल्पात २0 टक्केच जलसाठा

By admin | Updated: August 28, 2016 23:21 IST

मोताळा येथे पावसाची हजेरी; प्रकल्पक्षेत्रात केवळ ४७0 मि.मी पाऊस.

मुरलीधर चव्हाण मोताळा(जि. बुलडाणा),दि. २८: गत १८ दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने मोताळय़ासह परिसरातील काही गावांमध्ये पुन्हा हजेरी लावली. मात्र त्यानंतरही आतापर्यंंंत ४७0 मि.मी. पाऊस झाला असून, पावसाअभावी तालुक्याची दरोमदार असलेल्या नळगंगा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीने २0 ट क्य़ाची मजल गाठली. त्यामुळे पिकांना धोका कायम असून, मोठय़ा पावसाची गरज आहे.तालुक्यात कुठे रिपरिप, कुठे हलका तर काही ठिकाणी दमदार पडलेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तालुक्यात यावर्षी जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवडयापासून पावसाने कमी अधिक प्रमाणात चांगली हजेरी लावली. परंतु मागील १८ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. बुधवारनंतर दोन दिवस मो ताळय़ासह कोथळी, तरोडा, शिरवा, खरबडी, आडविहिर, परडा, रिधोरा, रोहिणखेड, थड, काळेगाव त पोवन भागात चांगाल पाऊस झाला. तर डिडोळा, चिंचपूर, नळगंगापूर, भोरटेक, पिंपरीसह धामणगाव बढे परिसरात हलक्या सरी कोसळल्या आहेत. या पावसामुळे सोयाबीन पिकाला चांगलेच जीवदान मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा तब्बल ८ हजार ९0८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून, सोयाबीन पिकांचा खर्च कमी आणि बाजारभाव शाश्‍वत असल्याने शेतकर्‍यांनी यंदा सोयाबीनवर भर दिलेला आहे. जोरदार पावसाअभावी किडींचा प्रादूर्भाव वाढला असून, ढगाळ वा तावरणामुळे पिके वेगवेगळया रोगराईस बळी पडत आहेत. विषारी औषधालाही कीड दाद देत नसल्याचे चित्र असून, शेतकरीवर्ग भविष्याबाबत धास्तावलेला आहे. तालुक्यातील १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी ६८८.६ आहे. मागील अडीच महिन्यात ४७0 मि.मी. पाऊस झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस अधिक दिसत असला तरी आतापर्यंंंत झालेला पाऊस जोरदार नाही. तुकड्या-तुकड्यात रिमझिम झालेल्या या पावसामुळे पलढग व नळगंगा प्रकल्पात पाणीसाठवण झालेली नाही. त्यामुळे मोठय़ा स्वरूपाच्या पावसाची नितांत गरज आहे.