शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

९० हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

काेराेनामुळे गत वर्षीपासून शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ शेतमाल विकण्याच्या वेळीच निर्बंध लावण्यात येत असल्याने भाव मिळाला नाही़ ...

काेराेनामुळे गत वर्षीपासून शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ शेतमाल विकण्याच्या वेळीच निर्बंध लावण्यात येत असल्याने भाव मिळाला नाही़ यावर्षीही तीच परिस्थिती हाेती़ २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नगदी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ हाताताेंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला हाेता़ या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली़ पीक कर्ज मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत़; मात्र त्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात यावर्षी १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले हाेते़ त्यापैकी २५ जूनपर्यंत केवळ ४९ हजार ९६४ शेतकऱ्यांना ४४० काेेटी ५६ लाख रुपयांचे कर्जच वितरित करण्यात आले़ केवळ ३६ टक्के शेतकऱ्यांनाच हे कर्ज वाटप करण्यात आले असून ६४ टक्के शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत़

राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता

पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे़ बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण हाेत नसल्याचे चित्र आहे़ सर्वात कमी पीक कर्ज बँक ऑफ बडाेदाने वितरित केले आहे़ या बँकेने केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे़ तसेच अलाहाबाद बँक १४ टक्के, युकाे आणि कॅनरा बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या १९ टक्के कर्ज वाटप केले आहे़ बँक ऑफ इंडियाने ५९ टक्के कर्ज वाटप केले आहे़ आयडीबीआय बँकेने ६६ टक्के कर्ज वाटप केले आहे़

--अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट--

मृग नक्षत्राच्या पावसावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती़ त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले़ पीक कर्ज मिळेल, या आशेवर अनेकांनी उसनवारी करून पेरणी केली़ त्यातच दुबार पेरणी करावी लागल्याने पुन्हा बियाणे, खते कशी विकत आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़