शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

राहेरी पुलासाठी ९ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व अैाषध प्रशासनमंत्री यांनी मुंबईत फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या एका बैठकीस या कामासाठी तत्त्वत: ...

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व अैाषध प्रशासनमंत्री यांनी मुंबईत फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या एका बैठकीस या कामासाठी तत्त्वत: मान्यता दिली होती. सोबत अनुषंगिक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एका दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी राहेरी पुलाचे आर. के. गुप्ता आणि अनुप सूर्यवंशी यांनी संरचनात्मक ऑडिट करत धोकादायक बनलेल्या या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे सुचविले होते. तसेच पुलाच्या सुपर स्ट्रक्चरची पुनर्बांधणी करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या पुलाच्या पुनर्निर्माणाचा प्रश्न कायम होता.

नागपूर-मुंबई हा मार्ग दर्जोन्नत होऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७३५ सी झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या औरंगाबाद विभागांतर्गत हा रस्ता येतो. या रस्त्यावरच खडकपूर्णा नदीवर राहेरी गावानजीक हा पूल आहे. हा जुना पूल हा १९७१-७२ मध्ये उभारण्यात आला होता.

--४१ किमीचा पडतो फेरा--

या धोकादायक पुलावरून सध्या जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अैारंगाबाद तथा मेहकरकडून येणाऱ्या वाहनांचा तब्बल ४१ किमींचा फेरा पडत आहे. या पुलाचे पुनर्निर्माण झाल्यास हा फेरा वाचेल. तसेच सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील व्यावसायिक व सामान्य नागरिक यांचे आर्थिक नुकसान टळून या मार्गावर रोजागारनिर्मितीस चालना मिळण्यास मदत होणार आहे.

--भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लावा--

बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची आणखी काही कामे होऊ घातलेली आहेत. मात्र, भूसंपादनाच्या काही अडचणीमुळे त्यात व्यत्यय येत आहे. याप्रकरणी भूसंपादन अधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन ही प्रकरणे त्वरित मार्गी लावल्यास बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचीही कामे मार्गी लागण्यास मदत होईल. त्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सहकार्य करावे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनुषंगिक पत्रात म्हटले आहे.