शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

तूर खरेदी केंद्रावर ९५०० क्विंटल तूर बाकी

By admin | Updated: April 30, 2017 19:34 IST

लोणार- तूर खरेदी रखडल्यामुळे शेतकºयांना एक एक दिवस मोजावा लागत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अजुनही ९५00 क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतिक्षेत आहे.

लोणार : २२ एप्रिल  पर्यंत बाजार समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या वाहनांची तूर खरेदी करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. परंतु या बाबत अद्याप निर्देश आलेले नसल्यामुळे खरेदी प्रक्रिया नव्याने केव्हा सुरू होणार या बाबत शेतक?्यांना उत्सूकता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांना एकेक दिवस मोजावा लागत आहे. दरम्यान लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मोजमाप न झालेली  ९५०० क्विंटल तूर आहे.  २२ एप्रिल रोजी शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत. लोणार येथील भारतीय खाद्य निगम चे तूर खरेदी केंद्र व  कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तूर केव्हापासून पुन्हा खरेदी करायची याविषयी निर्देश नाहीत. त्यामुळे खरेदी केव्हा सुरु होणार हे कोणीही सांगायला तयार नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तुरीचे माप लवकर होत नाही ही काळजीआणि डोक्यावर रणरणते उन असा मार त्यांना सहन करावा लागत आहे. वाहन आणि रोजचा खर्च वेगळा. शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मोकळे झाले की खरीपाची तयारी करायची आहे. बाजारातून बियाणे खरेदीसाठी त्यांना पैशाची गरज आहे आणि खुल्या बाजारामध्ये तूर विकल्यास हजार रुपयांचे नुकसान होत असल्यामुळे तूर उत्पादक कैचीत सापडला आहे.शासकीय तूर खरेदी केंद्र जानेवारी मध्ये सुरु झाले होते . त्यावेळेस खाजगी व्यापा?्यांनी तूरीचे भाव ३८००  रुपये  वरून ४२००  रुपये पर्यंत वाढ केली होती.परंतु शासकीय तूर खरेदी केंद्र बारदाण्या अभावी सतत बंद राहत असल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी तूरीचे भाव पुन्हा  ३५०० ते ३८०० रुपयांवर आणून ठेवला आहे .यामुळे लग्नसराईत कैचीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांना पैशासाठी कमी भावात तूर विकावी लागलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी ३५०० -३८०० रुपये प्रमाणे तुरीची खरेदी करत आहेत. शासकीय तूर खरेदी  दराचा विचार करता हजार रुपयांचा फरक आहे. ज्यांना पैसा मोकळा करायचा आहे ते शेतकरी व्यापाऱ्यांना माल देत आहेत. परंतु बहुतांश शेतकरी शासकीय तूर खरेदीची वाट पाहत आहेत.यामुळे २२ एप्रिल पर्यंत बाजार समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या वाहनांची तूर खरेदी करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे.त्यानुषंगाने २७ एप्रिल रोजी लोणार कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेल्या तूरीचा पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल सनियंत्रण समिती अध्यक्ष उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला आहे.यावेळी कृउबा समिती सभापती शिवपाटील तेजनकर, तहसिलदार सुरेश कव्हळे , संजय भोईटे, मार्केटिंग फेडरेशन सदस्य, लोणार खरेदी-विक्री संघ सदस्य,सचिव वायाळ, कृ.ऊ.बा. संचालक उपस्थित होते.