शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धान्य वितरण बारदान्यापोटी जिल्ह्याला ८४ लाखांचा चुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:02 IST

पुरवठा विभागाला पर्यायाने शासनाला लक्षावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसून येते.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यात अतिशय मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट लाभार्थी कुटूंबासाठी या दोन योजनेतंर्गत वितरीत केल्या जाणाऱ्या बारदान्यापोटी महिन्याला तब्बल ८४ लक्ष रुपयांचा खर्च केला जात आहे. उल्लेखनिय म्हणजे, उपरोक्त दोन्ही योजनेसाठी उपयोगात येणाºया बारदाºयाचा पुनर्वापर आणि उपयोग होत नसल्याने पुरवठा विभागाला पर्यायाने शासनाला लक्षावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसून येते.विविध योजनेच्या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील १३ तालुक्यातील बुलडाणा, चिखली, अमडापूर, दे. राजा, मेहकर, डोणगाव, लोणार, सिंदखेड राजा, साखरखेर्डा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या १६ बेस गोदामातून धान्य पाठविण्यात येते.बेस गोदामातून आलेल्या धान्याचे उप त्या-त्या भागातील गोदामात प्रमाणीकरण करण्यात येते. यामध्ये ५० किलो धान्याचे वजन: ५८०(कट्ट्याचे वजन ५८० ग्रॅम):५० यातून कट्ट्याचे वजन कमी करण्यात येते. त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे १५०० स्वस्त: धान्य दुकानदारांना बारदाना हाताळणीसाठी दिला जातो. स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल प्रमाणे दिलेले २ कट्ट्यांचा कोणताही पुनर्वापर केला जात नाही. तसेच हा बारदाना परत घेतल्या जात नाही. त्यामुळे जिल्ह्याला लागणाºया लक्षावधी रूपयांच्या बारदानाच्या कोणताही हिशोब नंतर जुळून येत नसल्याचे दिसून येते.

अंत्योदय योजनेसाठी लागतात २ लक्ष ३६ हजार कट्टे!अंत्योदय अन्न योजनेतंर्गत जिल्ह्याचे १ लक्ष १८००० क्विंटल धान्याचे मासिक नियतन आहे. हे धान्य वितरीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला एका क्ंिवटलला दोन प्रमाणे २ लक्ष ३६ हजार कट्टे लागतात. तर प्राधान्य गट लाभार्थी कुटुंबासाठी मासिक धान्याचे नियतन ९२००० हजार क्विंटल धान्याचे आहे. प्राधान्य गटातील धान्य वितरणासाठी १ लक्ष ८४ हजार कट्टे लागतात.

कट्ट्यांसाठी ८४ लाखांचा खर्च!४योजना निहाय धान्य वितरणासाठी २ लक्ष ३६००० (अंत्योदय-१ लक्ष १८००० क्ंिवटल) ४७ हजार २०००० रुपयांचे तर १ लक्ष ८४००० कट्टे (प्राधान गट लाभार्थी योजना-९२ हजार क्विंटल धान्य) किंमत ३६ लक्ष ८०००० रुपये असा एकुण ८४ लक्ष रुपयांचा बारदाना लागतो. या बारदान्याचा पुनर्वापर आणि कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाला महिन्यांकाठी लक्षावधी रूपयांचा फटका बसत आहे.

असे आहे धान्य निहाय नियतन!४जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट लाभार्थी कुटुंब योजनेंतर्गत ४३ हजार ७९० क्ंिवटल तांदूळ वितरीत केला जातो. ५३ हजार७१० क्विंटल गहू तर शेतकरी योजनेतंर्गत १९ हजार १०० लाभार्थ्यांना धान्याचे वितरण केले जाते.

टॅग्स :khamgaonखामगाव