शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

धान्य वितरण बारदान्यापोटी जिल्ह्याला ८४ लाखांचा चुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:02 IST

पुरवठा विभागाला पर्यायाने शासनाला लक्षावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसून येते.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यात अतिशय मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट लाभार्थी कुटूंबासाठी या दोन योजनेतंर्गत वितरीत केल्या जाणाऱ्या बारदान्यापोटी महिन्याला तब्बल ८४ लक्ष रुपयांचा खर्च केला जात आहे. उल्लेखनिय म्हणजे, उपरोक्त दोन्ही योजनेसाठी उपयोगात येणाºया बारदाºयाचा पुनर्वापर आणि उपयोग होत नसल्याने पुरवठा विभागाला पर्यायाने शासनाला लक्षावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसून येते.विविध योजनेच्या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील १३ तालुक्यातील बुलडाणा, चिखली, अमडापूर, दे. राजा, मेहकर, डोणगाव, लोणार, सिंदखेड राजा, साखरखेर्डा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या १६ बेस गोदामातून धान्य पाठविण्यात येते.बेस गोदामातून आलेल्या धान्याचे उप त्या-त्या भागातील गोदामात प्रमाणीकरण करण्यात येते. यामध्ये ५० किलो धान्याचे वजन: ५८०(कट्ट्याचे वजन ५८० ग्रॅम):५० यातून कट्ट्याचे वजन कमी करण्यात येते. त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे १५०० स्वस्त: धान्य दुकानदारांना बारदाना हाताळणीसाठी दिला जातो. स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल प्रमाणे दिलेले २ कट्ट्यांचा कोणताही पुनर्वापर केला जात नाही. तसेच हा बारदाना परत घेतल्या जात नाही. त्यामुळे जिल्ह्याला लागणाºया लक्षावधी रूपयांच्या बारदानाच्या कोणताही हिशोब नंतर जुळून येत नसल्याचे दिसून येते.

अंत्योदय योजनेसाठी लागतात २ लक्ष ३६ हजार कट्टे!अंत्योदय अन्न योजनेतंर्गत जिल्ह्याचे १ लक्ष १८००० क्विंटल धान्याचे मासिक नियतन आहे. हे धान्य वितरीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला एका क्ंिवटलला दोन प्रमाणे २ लक्ष ३६ हजार कट्टे लागतात. तर प्राधान्य गट लाभार्थी कुटुंबासाठी मासिक धान्याचे नियतन ९२००० हजार क्विंटल धान्याचे आहे. प्राधान्य गटातील धान्य वितरणासाठी १ लक्ष ८४ हजार कट्टे लागतात.

कट्ट्यांसाठी ८४ लाखांचा खर्च!४योजना निहाय धान्य वितरणासाठी २ लक्ष ३६००० (अंत्योदय-१ लक्ष १८००० क्ंिवटल) ४७ हजार २०००० रुपयांचे तर १ लक्ष ८४००० कट्टे (प्राधान गट लाभार्थी योजना-९२ हजार क्विंटल धान्य) किंमत ३६ लक्ष ८०००० रुपये असा एकुण ८४ लक्ष रुपयांचा बारदाना लागतो. या बारदान्याचा पुनर्वापर आणि कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाला महिन्यांकाठी लक्षावधी रूपयांचा फटका बसत आहे.

असे आहे धान्य निहाय नियतन!४जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट लाभार्थी कुटुंब योजनेंतर्गत ४३ हजार ७९० क्ंिवटल तांदूळ वितरीत केला जातो. ५३ हजार७१० क्विंटल गहू तर शेतकरी योजनेतंर्गत १९ हजार १०० लाभार्थ्यांना धान्याचे वितरण केले जाते.

टॅग्स :khamgaonखामगाव