शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसामुळे ७९ हजार हेक्टरवरील तूर पिकाला धोका; शेतात पाणी साचल्याने पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव 

By योगेश देऊळकार | Updated: September 12, 2022 19:47 IST

अतिपावसामुळे शेतात पाणी साचल्याने तूर पिक पिवळे पडत असून त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.

योगेश देऊळकार, खामगाव : जिल्ह्यात बहुतांश भागात १० सप्टेंबर रोजी सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. अतिपावसामुळे शेतात पाणी साचल्याने तूर पिक पिवळे पडत असून त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे ७९ हजार ३५० हेक्टरवरील पीक धोक्यात आले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

यावर्षी जिल्ह्यात खरीप पेरण्या विलंबाने झाल्या. यामुळे शेतकऱ्यांनी उडीद, मुगाकडे पाठ फिरवित सोयाबिन पिकाला सर्वाधिक पसंती दर्शविली. जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ४५३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर २ लाख २ हजार ९९७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. या दोन्ही पिकांमध्ये आंतरपिक म्हणून तुरीची पेरणी करण्यात आली असून या पिकाचे क्षेत्र ७९ हजार ३५० एवढे आहे. आतापर्यंत योग्य वेळी व योग्य प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वच पिके चांगली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाचा कपाशी व मका पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचबरोबरच पाणी साचणाऱ्या शेतजमिनीवरील तूर पिकावरही पावसाचा परिणाम झाला आहे. अतिपावसामुळे हे पिक पिवळे पडून सुकत असल्याचे दिसून येत आहे.

पाण्याची वाट मोकळी करावी

तूर पिक असलेल्या शेतात पाणी साचणे घातक आहे. यामुळे या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पीक नष्ट होण्याची भीती वाढते. मर रोगाची लागण देखील यामुळे होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी पाऊस थांबताच शेतातील पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, असे आवाहन जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

उत्पादनात घट येण्याची भीती

पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पिक सुकत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिकस्थिती चांगली असताना अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे या पिकाला खूप मोठी झळ बसली आहे.

अतिपावसाचा तूर पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीची झाडे सुकत आहेत. या पिकाची कृषी विभागाकडून पाहणी करून रोगावर नियंत्रण मिळविण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. - संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा.

सततच्या पावसामुळे तूर पिकाची वाढ खुंटली असून पिक पिवळे पडले आहे. काही झाडे देखील सुकत आहेत. - सतीश सोनटक्के, शेतकरी जलंब. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती