शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांना आरटीईचा ‘ग्रीन सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:26 IST

बुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. तिसऱ्या लॉटरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरीता १८ जुलैची अंतीम मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत १ हजार ८५० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रामध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत आहे. मोफत प्रवेशासाठी ५ हजार ३२८ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज आले आहेत. त्यापैकी पाहिल्या दोन लॉटरीमध्ये २ हजार ७०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ८५० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान, १० जुलै रोजी राज्यस्तरीय तिसरी लॉटरी काढण्यात आली. तिसºया लॉटरीमध्ये ७७२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या ५ हजार ३२८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ४८० विद्यार्थ्यांची एकूण तीन लॉटरींमधून निवड करण्यात आली आहे.सध्या तिसºया लॉटरीत निवड झालेल्या ७७२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू आहे. शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी गेला असल्याने प्रवेशाकरीता पालकांची तारांबळ उडत आहे. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना नंबर लागल्याने आता ही संधी हुकायला नको, यासाठी पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पालकांना एसएमस जाण्यास सुरूवात१० जुलै २०१९ रोजी राज्यस्तरीय तिसरी लॉटरी काढण्यात आली आहे. राज्यातील लॉटरी लागलेल्या पालकांना ११ जुलै २०१९ पासून एसएमएस जाण्यास सुरवात झाली आहे. एसएमएस न आल्यास वेबसाईट वर जाऊन ‘अ‍ॅप्लीकेशन वाईज डिटेल्स’मध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का ते पाहावे लागणार आहे. फक्त एसएमएसवर अवलंबून राहू, नये असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.प्रवेशासाठी सहा दिवस४तिसºया लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ११ जुलै पासून १८ जुलै पर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिलया आहेत. त्यानुसार प्रवेशासाठी पालकांना सात दिवसाचा कालावधी देण्यात आला असून, आता अवघे सहा दिवस पालकांच्या हातात उरले आहेत. सध्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रमास सुरूवात झालेली असल्याने प्रवेशासाठी पालकांच्या धवपळ सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा