शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राष्ट्रीय ग्रामीण पेयजलची ७७ कामे प्रगतीपथावर!

By admin | Updated: October 3, 2016 02:51 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी ८६ कामांचे उद्दिष्ट दिले असून येत्या उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. 0२- जिल्ह्यात गेल्या तीन वर्षातील वाढती पाणी टंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठय़ाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सन २0१६-१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी ८६ पाणी पुरवठय़ांच्या कामांचे उद्दिष्ट देण्यात आले असून जिल्हाभरात उद्दिष्टापैकी ७७ कामे प्रगतिपथावर सुरू आहेत.गेल्या तीन वर्षात पाणीटंचाईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावात अस्तित्वात असलेल्या सर्व पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन त्यातील स्रोतांचे संवर्धन व बळकटीकरण करणे, तसेच पाणी पुरवठय़ाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत शासनाच्या धोरणानुसार मागणी आधारित लोकसहभागातून पाणीपुरवठय़ाचे सुधारित धोरण जाहीर केले असून ग्रामस्तरावर ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन केली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेची कामे मागणी आधारित समूह सहभागावर नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल व दुरुस्ती ग्रामस्थांच्या हातात सोपविण्यात आलेली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्तावित उपाययोजनांच्या सूक्ष्म नियोजनाअंती दरवर्षी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. त्याचप्रमाणे सन २0१६-१७ चा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून, कृती आराखड्यानुसार तालुकानिहाय पाणीपुरवठय़ाच्या ८६ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी पाणीपुरवठय़ाची ८ कामे, चिखली ८, देऊळगावराजा ५, खामगाव ६, लोणार ४, मलकापूर ५, मेहकर १४, मोताळा १0, नांदुरा ११, सिंदखेडराजा १४, शेगाव एक अशा एकूण ८६ कामांचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात पाणीपुरवठय़ाची ७७ कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन तालुक्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले नाही. यामध्ये १00 टक्के घरगुती नळ जोडणे व मागील तीन वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे येणार्‍या उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावे टंचाईमुक्त होणार आहेत.उद्दिष्टाव्यतिरिक्त २0 कामांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखड्यामध्ये ८६ कामांचे उद्दिष्ट आहे. तसेच उद्दिष्टाव्यतिरिक्त राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखड्यात २0 कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात २, चिखली ३, जळगाव जामोद १, खामगाव २, मलकापूर १, मेहकर २, नांदुरा ७, सिंदखेडराजा १, संग्रामपूर १ अशापक्रारे उद्दिष्टांव्यतिरिक्त कामांचा समावेश करण्यात आलेला आहे; परंतु उद्दिष्टाव्यतिरिक्तचे एकही काम सध्या हाती घेण्यात आलेले नाही.