शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेशन कार्डवरील ७५ हजार नावे होणार कमी!

By admin | Updated: April 2, 2017 01:57 IST

आधार लिंकिंग न केल्याचा परिणाम; खामगावकरांनी दाखवली उदासीनता.

खामगाव, दि. १- तालुक्यातील जवळपास ७५ हजार लाभार्थींचे आधार लिंकिंग न झाल्याने त्यांची नावे रेशन कार्डवरून वगळली जाणार आहेत. विशेषत: खामगाव शहरातील रहिवाशांनी आधार लिंकिंगबाबत उदासीनता दाखवलेली आहे. तालुक्यातील सर्वच प्रकारच्या रेशनकार्डधारक कुटुंबांची एकूण संख्या ५२ हजार ५७१ असून, एकूण लाभार्थीसंख्या २ लाख ६0 हजार आहे. या सर्व लाभार्थींचे आधार लिंकिंग करुन घेण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याकरिता नागरिकांना आपला आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडून घेण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले होते. यासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली. मागील आठवड्यातही पुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रक काढून २७ मार्चपर्यंत आधार लिंकिंग करून घेण्याचे आवाहन केले. तसेच खामगाव शहरात तीन दिवस ऑटोरिक्षा फिरवून जाहीर आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिकांनी याबाबत मोठय़ा प्रमाणात उदासीनता दाखविल्याचे दिसून येते. मार्चअखेरपर्यंत १ लाख ७८ हजार लाभार्थींचे आधार लिंकिंग झालेले असून, मागील आठवड्यात राबविलेल्या प्रचार मोहिमेतून केवळ सात हजार आधार लिंकिंगचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यांची आधार लिंकिंगची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तब्बल ७५ हजार लाभार्थींचे अर्जच अद्याप न आल्याने आता या लाभार्थींची नावे रेशनकार्डवरून कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आधार लिंकिंग न झालेली सुमारे ७0 टक्के नावे ही खामगाव शहरातील असून, शहरवासीयांनी याबाबत प्रचंड उदासीनता दाखवल्याचे दिसून येते. मुदत आणखी वाढविण्याची मागणीआधार लिंकिंगअभावी स्वस्त धान्यासह शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची पाळी लाभधारकांवर येऊ शकते. त्यामुळे आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडून घेण्याकरिता प्रशासनाने आणखी मुदतवाढ द्यायला हवी, अशी मागणी रेशन कार्डधारकांकडून होत आहे.गैरप्रकारांना बसणार आळाअनेक लाभार्थींची नावे दोन-दोन ठिकाणी रेशन कार्डवर असल्याचे आधार लिंकिंग प्रक्रियेत दिसून आलेले आहे. विशेषत: लग्न होऊन सासरी जाणार्‍या मुलींच्या बाबतीत असे होताना दिसते. तसेच बाहेरगावी निघून गेलेल्यांची नावे रेशन कार्डवर आहेत. त्यांच्या नावे धान्याची उचल केली जाते. अशा अनेक गैरप्रकारांना आधार लिंकिंगमुळे आळा बसणार असून, शासनाचे नुकसान टळणार आहे.धान्य उचलण्यासाठी थम्ब मशीन!आधार कार्ड जोडणी झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानावर धान्य घेण्यासाठी गेलेल्या लाभार्थीला त्या ठिकाणी असलेल्या थम्ब मशीनवर अंगठा ठेवावा लागणार आहे. त्यानंतर धान्याची उचल होणार आहे. यामुळे शासकीय योजनेचा लाभ प्रत्यक्षात किती लोक घेतात व स्वस्त धान्य दुकानातून किती प्रमाणात धान्य विक्री होते, याचा अंदाज लागणार आहे.