शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

सात दिवसांत वाढले ७0 हजार शेतकरी !

By admin | Updated: August 13, 2015 00:29 IST

पीक विमा मुदतवाढीचा लाभ; १४ कोटींची विमा रक्कम जमा.

बुलडाणा : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना लागू केली आहे. २0१५-१६ या खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील २ लाख ८८ हजार ३५८ हेक्टरवरील पिकांना विम्याचे संरक्षक कवच मिळाले आहे. दरम्यान, शासनाने पीक विमा काढण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या सात दिवसांत तब्बल ७0 हजार शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. कधी अतवृष्टी, तर कधी अवर्षण अशा परिस्थितीमुळे नापिकी होते. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो व त्याला नैराश्य येते, शिवाय शेतकरी आत्महत्याच्या घटनासुद्धा घडत आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाकडून मदत मिळत असली तरी ती पिकाच्या नुकसानाची भरपाई करेल एवढी नसते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पीक विमा काढला, तर नुकसानाच्या तुलनेत समाधानकारक मदत मिळण्याची आशा असते. त्यामुळे या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये घेण्यात येणार्‍या ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तीळ, बाजरी, नाचणी, भुईमूग, कांदा, मका या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा हप्ता ठरविण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानाच्या स्थितीत काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या या योजनेत ३0 जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार २३ शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला. २0१५-१६ च्या खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी पेरणीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ४ जूनपासून तर शेवटचा टप्पा म्हणजे ३१ जुलैपर्यत पीक विमा काढण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्यात आले होते. त्याला सर्व १३ तालुक्यांतील सुमारे अडीच लाख शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला. याशिवाय ७ ऑगस्टपर्यत योजनेला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे पुढे सात दिवसांत तब्बल ७0 हजार शेतकर्‍यांनी याचा लाभ घेतला.