शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांत वाढले ७0 हजार शेतकरी !

By admin | Updated: August 13, 2015 00:29 IST

पीक विमा मुदतवाढीचा लाभ; १४ कोटींची विमा रक्कम जमा.

बुलडाणा : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना लागू केली आहे. २0१५-१६ या खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील २ लाख ८८ हजार ३५८ हेक्टरवरील पिकांना विम्याचे संरक्षक कवच मिळाले आहे. दरम्यान, शासनाने पीक विमा काढण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या सात दिवसांत तब्बल ७0 हजार शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. कधी अतवृष्टी, तर कधी अवर्षण अशा परिस्थितीमुळे नापिकी होते. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो व त्याला नैराश्य येते, शिवाय शेतकरी आत्महत्याच्या घटनासुद्धा घडत आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाकडून मदत मिळत असली तरी ती पिकाच्या नुकसानाची भरपाई करेल एवढी नसते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पीक विमा काढला, तर नुकसानाच्या तुलनेत समाधानकारक मदत मिळण्याची आशा असते. त्यामुळे या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये घेण्यात येणार्‍या ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तीळ, बाजरी, नाचणी, भुईमूग, कांदा, मका या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा हप्ता ठरविण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानाच्या स्थितीत काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या या योजनेत ३0 जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार २३ शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला. २0१५-१६ च्या खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी पेरणीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ४ जूनपासून तर शेवटचा टप्पा म्हणजे ३१ जुलैपर्यत पीक विमा काढण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्यात आले होते. त्याला सर्व १३ तालुक्यांतील सुमारे अडीच लाख शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला. याशिवाय ७ ऑगस्टपर्यत योजनेला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे पुढे सात दिवसांत तब्बल ७0 हजार शेतकर्‍यांनी याचा लाभ घेतला.