शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

५८ ग्रामपंचायतींचा विद्युत पुरवठा खंडित; पाणी पुरवठ्यावर परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:32 IST

मेहकर : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींनी विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणकडून या ५८ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे वीज बिलाचे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत गाव स्तरावर पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे २ कोटी ८४ लाख रुपये थकले

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींनी विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणकडून या ५८ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे वीज बिलाचे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत गाव स्तरावर पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून, जवळपास १०९ पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन आहेत. अनेक ग्रामपंचायतींचे विद्युत देयके थकीत असल्याने त्या त्या ग्रामपंचायतचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील अकोला ठाकरे, परतापूर, पिंप्रीमाळी, उकळी, घाटबोरी, सुकळी, मुंदेफळ, हिवरा खु., शेलगाव काकडे, विवेकानंद नगर, विश्वी, वरूड, लोणी गवळी, गुंज, गोहगाव, मादणी, पारंगखेड, वाडी मोसंबी, बरटाळा, लोणी गवळी, विठ्ठल वाडी, वरूडी, वडगाव माळी, मोहना बु., सावंगी माळी, पिंपळगाव, हिवरा बु., कासारखेड, सावत्रा, वडाळी, जामगाव, सारंगपूर, बेलगाव, मांडवा फॉरेस्ट, सुळा, डोणगाव, साब्रा, जैताळा, घुटी, सारंगपूर, सुभाणपूर, मोळा, सावंगीविहिर, गौंढाळा, उसरण, नागझरी, पारखेड, नांद्रा, चायगाव, भोसा, कनका या ग्रामपंचायतींचे  वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींकडे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा वेळी अनेक ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन बंद केल्याने गावकºयांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. 

सवणा येथील विद्युत पुरवठा बंद!सवणा : येथील पथदिवे २७ फेब्रुवारीपासून बंद असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊून पथदिवे सुरू करावे, अशी मागणी श्याम करवंदे तसेच ७५ गावकºयांनी ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिखली तालुक्यातील सवणा ग्रामपंचायतचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने रात्री रस्त्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे गावकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासंदर्भात सवणा सरपंच नंदा हाडे व सदस्यांना विचारणा केली असता विद्युत देयक जि.प.मार्फत शासन भरणा करीत असते; परंतु शासनाने जि.प.ला अनुदान न दिल्यामुळे जि.प.ने सदर बिल भरणा केले नाही, त्यामुळे विद्युत विभागामार्फत विद्युत पुरवठा खंडित केल्याचे सांगण्यात येते. येत्या आठवड्यात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

अनेक ग्रामपंचायतींकडे विद्युत बिलाचे लाखो रुपये थकीत आहेत. मार्च महिन्यामध्ये थकीत विद्युत बिलाची वसुली सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतने विद्युत बिलाचा भरणा केल्यास वीज पुरवठा सुरळीत सुरू  ठेवण्यात येईल.- प्रशांत कलोरे,अभियंता महावितरण, उपविभाग, मेहकर 

टॅग्स :Mehkarमेहकरmahavitaranमहावितरण