शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डायरियामुळे बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी ५७ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:43 IST

57 children die every year in Buldana district due to diarrhea : बुलडाणा जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास ५७ बालकांचा डायरियामुळे मृत्यू होतो.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे गेल्या वर्षी खंड पडलेल्या अतिसार (डायरिया) नियंत्रण पंधरवाडा मोहिम यावर्षी अधिक गांभिर्यपूर्वक राबविण्यात येणार असून १५ जुलै पासून या मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास ५७ बालकांचा डायरियामुळे मृत्यू होतो. त्या पार्श्वभूमीवर हे प्रमाण शुन्य टक्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाने या वर्षी ही मोहिम अधिक जोरकसपणे राबविण्याचा निर्धार केला आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात जवळपास २०१४ पासून अतिसार अर्थात डायरिया नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत असतो. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे या मोहिमेला ब्रेक देण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी ही मोहिम अधिक गांभिर्यपूर्वक राबविण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे. देशामध्ये बालमृत्यूचे प्रमाण पाहता त्यापैकी दहा टक्के मृत्यू हे डायरियामुळे होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढलेला आहे. त्या आधारावर दरवर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येतो. यामध्ये अतिसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तथा रुग्णालयात अतिसार झालेल्या बालकाला केव्हा दाखल करणे आवश्यक आहे. सोबतच अेाआरएस आणि झिंक गोळ्यांचे डोस नियमितपणे कसे द्यायचे यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन जिल्ह्यातील १८०० आशा वर्कसच्या माध्यमातून घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. अेाआरएसचे द्रावण अर्थात क्षारसंजिवनी कशी तयार करायची याचेही प्रात्याक्षीक दिल्या जाणार आहे. डायरिया प्रामुख्याने उन्हाळा आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना होतो. 

१५ जुलै ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात अतिसार नियंत्रण मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये डायरियामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण हे शून्य टक्क्यांवर आणण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच या पंधरवाड्यात जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये अेाआरएस व झींक कॉर्नर उभारण्यात येऊन याविषयी जनजागृती केली जाणार आहे.- डॉ. रविंद्र गोफणे, माता व बालसंगोपन अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य