शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

३२ तासात खडकपूर्णातून सोडले ५० दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:19 IST

प्रकल्पाचे १९ दरवाजे हे ६० सेंटीमिटरने उघडलेलेच असून आतापर्यंत ५० दलघमी पाणी या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या ३४ तासापासून खडकपूर्णा अर्थात संत चोखामेळा सागरातून ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदीत करण्यात येत असून अद्यापही प्रकल्पामध्ये पाण्याची मोठी आवक होत असल्याने प्रकल्पाचे १९ दरवाजे हे ६० सेंटीमिटरने उघडलेलेच असून आतापर्यंत ५० दलघमी पाणी या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे.बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरण चार वेळा भरेल ऐवढ्या पाण्याचा हा विसर्ग आतापर्यंत करण्यात आला आहे. दुष्काळी पट्टा म्हणून मराठवाड्याची २०१२ नंतर राज्यात ओळख झाली आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर मराठवाड्याने गेल्या वर्षी हक्क सांगत जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी या प्रकल्पारून इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून वाटर ग्रीड योजना कार्यान्वीत करण्याचा निर्णय तत्कालीन पाणीपुरवठा मंत्र्यांनी घेतला होता. ९२ गावांची पाणीपुरवठा योजना खडकपूर्णावरून कार्यान्वीत करण्याचे त्यावेळी ्प्रयोजन होते. त्यामुळे विदर्भ विरुद्ध मराठवाडा असा पाण्याचा संघर्ष त्यावेळी निर्माण झाला होता. राज्यस्तरावर हा मुद्दा त्या वेळी चांगलाच गाजला होता. मराठवाड्यातील कन्नड नजीक असलेल्या गौताळा अभयारण्यातून उगम पावणाºया खडकपूर्णा नदीचे बहुतांश पाणलोट क्षेत्र हे मराठवाड्यात येत असल्याने त्यावर मराठवाड्यातून हक्क सांगितल्या जात होता. दरम्यान २०१३ नंतर गेल्या वर्षी प्रथमच पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प भरला होता. ऐरवी मृत साठ्याची पातळीही गाठण्यात अपयशी ठरलेला हा प्रकल्प निसर्गाच्या कृपेमुळे गेल्या दोन वर्षापासून भरत आहे. यंदाही तो आता पर्यंत भरला असता. मात्र जुलै मधील ७० टक्के पाणीपातली राखण्यासाठी विसर्ग होत आहे.

मृत साठ्याची पातळीही गाठत नव्हता खडकपूर्णा प्रकल्प२०१३ मध्ये प्रथमच पूर्ण क्षमतेने भरलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात त्यानंतर मृतसाठ्याची पातळीही या प्रकल्पाने गाठली नव्हती. २०१८ मध्ये सिंदखेड राजा, लोणार व देऊळगाव राजा तालुक्यातील ४६ गावांचा पाणीप्रश्नही या प्रकल्पात पाणी उपलब्ध नसल्याने बिकट बनला होता. त्यावेळी नियमांना बगल देत नदीपात्रात या गावांसाठी पाणी सोडण्यात आले होते. आज मात्र निसर्गाच्या कृपेमुळे प्रकल्पाच्या मृतसाठ्याच्या (६० दलघमी) बरोबरीने प्रकल्पातून नदीपात्रात गेल्या ३२ तासात पाणी सोडण्यात आले. २४ जुलै रोजी पहाटे चार दरवाजे उघडण्यात आले होते. रात्री सर्व १९ दरवाजे ६० सेमीनेउघडण्यात आले असून अद्यापही ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :khadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरbuldhanaबुलडाणा