शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

१५ टक्के शेतकऱ्यांनाच रब्बीचे ५० कोटी कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:14 IST

आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे.

ठळक मुद्दे बँकानी रब्बीमध्ये ३३ कोटी ९१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. चार हजार २३८ शेतकºयांना प्रत्यक्षात हे कर्ज मिळाले आहे. पीक कर्ज वाटपचा वेग वाढविणे सध्या क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामात अतिवृष्टीचा फटका सहन करणाºया शेतकºयाना रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असून जमिनीतील जादा ओलही कमी झाल्यामुळे शेतकºयानी रब्बी पेºयासाठी लगबग सुरू केली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पीक कर्ज देण्याचा वेग आता वाढविण्याची गरज असून आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे.रब्बी हंगामात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकºयांची संख्या ही ३६ हजार ९८३ असून त्यापैकी प्रत्यक्षात पाच हजार ४७० शेतकºयांना आतापर्यंत पीक कर्ज देण्यात आले आहे. २० नोव्हेंबर दरम्यान १२ टक्के शेतकºयांना ३८ कोटी रुपयांच्या आसपास पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. नोव्हेंबर संपता संपता त्यात ११ कोटी ६६ लाख रुपयांची जवळपास भर पडली असली तरी पीक कर्ज वाटपचा वेग वाढविणे सध्या क्रमप्राप्त आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप आणि रब्बी मिळून आतापर्यंत ५८ हजार ८९ शेतकºयांना ४६३ कोटी २३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. एक हजार ९७० कोटी ८६ लाख रुपयांच्या वार्षिक उदिष्टाच्या तुलनेत प्रत्यक्षात २४ टक्केच हे कर्ज वाटप झालेले आहे. खरीप व रब्बीची तुलना करता रब्बी हंगामात तुलनेने पीक कर्ज वाटपाचा वेग वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.दुसरीकडे गेल्या महिन्यातच ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांच्या निधी वाटपास मान्यता देण्यात आली होती. हा निधीही जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला होता. दरम्यान यापैकी बहुतांश रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असून रब्बी हंगामातील पेरणीसाठी त्याचा शेतकºयांना लाभ झाला आहे. आता केंद्राकडून प्रत्यक्षात कधी मदत मिळते याची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. त्यामुळेच शेतकºयांना वर्तमान स्थितीत रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी पैशांची निकड असल्याचे चित्र आहे. १५ डिसेंबर पर्यंत रब्बीचा हंगाम साधारणत: राहतो. त्यामुळे शेतकºयांनी आता पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकानी रब्बीमध्ये ३३ कोटी ९१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. चार हजार २३८ शेतकºयांना प्रत्यक्षात हे कर्ज मिळाले आहे. खासगी बँकांनी ११ कोटी ९७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. त्याची टक्केवारी ३२ च्या आसपास जाते. जिल्ह्यातील ग्रामिण बँकांनी तीन कोटी ७६ रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून त्याची टक्केवारी ही १२.०७ टक्के आहे.खरीपापेक्षा रब्बी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी अधिक४खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात आकडेवारी पाहता रब्बी हंगामात खरीपाच्या तुलनेत जादा पीक कर्जवाटप करण्यात आल्याचे टक्केवारी सांगते खरीपाच्या तुलनेत रब्बीचे उदिष्ट कमी असले तरी त्याचा वाटपाचा वेग तुलनेने अधीक असल्याने ही टक्केवारी जादा आहे. खरीपात एकूण उदिष्ठाच्या २३ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले तर रब्बीमध्ये आतापर्यंत एकुण उदिष्ठाच्या २५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या काळात यातमध्ये आणखी वाढ होणार असून फेब्रुवारी पर्यंत पीक कर्ज वाटप केल्या जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी