नीलेश शहाकार बुलडाणा: पेरणीसाठी वापरावयाचे बियाणे दज्रेदार, शिवाय खते व कीटकनाशके शुद्ध असावी लागते. या मूलभूत बाबींचा विचार करून गतवर्षी कृषी विभागाच्या परीक्षण प्रयोगशाळेत खत, बी-बियाणे व कीटकनाशकाच्या १,२१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यात ४९ नमुने अप्रमाणित ठरली. या धर्तीवर २0१७-१८ साठी १,२९९ नमुने तपासणीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले. जिल्ह्यात २0१७-१८ या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, शेतकर्यांसाठी १ लाख ३६ हजार क्विंटल विविध बियाण्यांची मागणी आहे. कोणत्याही पिकांचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी अधिक उत्पादन देणार्या संकरित, सुधारित जातींची लागवड करावी लागते. शिवाय बी-बियाणे, खते व कीटकनाशक दज्रेदार असावी लागते. खरीप हंगाम सुरू होताच शेतकरी पेरणीसाठी बियाणे, खत व कीटकनाशके बाजारातून खरेदी करतात. बर्याच वेळा शेतकरी आपले चांगले बियाणे व घरगुती कीटकनाशके हंगामासाठी राखून ठेवतात. प्रसंगी ते इतरांनाही विकत देतात.मात्र या लक्ष्यांकाची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासणी झालेली नसते. त्यांच्या दर्जाबाबत कोणतीही खात्री दिलेली नसते. केवळ एकमेकांच्या विश्वासावर हे बियाणे खरेदी केले जाते. म्हणून अशा पेरणीपूर्वी तपासणी करणे आवश्यक असते.
खत बियाण्यांचे ४९ नमुने अप्रमाणित
By admin | Updated: April 23, 2017 00:54 IST