शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तूर उत्पादक शेतकर्‍यांचे ४८ लाख रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:02 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्‍यांची दहा लाख  ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी  ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश  रक्कम शेतकर्‍यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे  ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप अदा करण्यात  आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून स्पष्ट करण्यात  आले आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांकडे अडीच लाख क्विंटल तूर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्‍यांची दहा लाख  ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी  ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश  रक्कम शेतकर्‍यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे  ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप अदा करण्यात  आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून स्पष्ट करण्यात  आले आहे.गेल्या वर्षी राज्यात तुरीचे उत्पादन मुबलक झाले होते. राज्य  शासनाने विदर्भ  कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नाफेड  आणि बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शेतकर्‍यांची दहा लाख ४९  हजार २२२ क्विंटल तूर बुलडाणा जिल्हय़ात खरेदी केली होती.  त्यापोटी शेतकर्‍यांना ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार १९ रुपये  राज्य शासनाला अदा करावयाचे होते; मात्र मधल्या काळात ही  रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये ओरड होती. राज्य शासनाकडून ही ओरड पाहता जिल्हय़ासाठी ५२९ कोटी  ८५ लाख ७३ हजार रुपयांची ही रक्कम जिल्ह्यास पूर्वीच प्राप्त  झाली असून, त्यापैकी बहुतांश रकमेचे वाटप करण्यात  आल्याचे सूत्रांनी सांगितले. अद्यापही ४८ लाख रुपये शे तकर्‍यांची देणी बाकी आहे; मात्र बँकिंग स्तरावरील पत पुरवठय़ाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम अद्याप शे तकर्‍यांना मिळालेली नाही; मात्र तीही लवकरच शेतकर्‍यांना  मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गतवर्षीचे मुबलक तुरीचे पीक आणि त्यानंतर काही ठिकाणी तूर  खरेदी केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामुळे तुरीचा मुद्दा राज्यभर  गाजला होता. त्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने पावले उचलत तूर  खरेदीला प्राधान्य दिले होते.चार ऑक्टोबर २0१७ अखेर जवळपास १३ हजार ६९९  िक्वंटल तुरीच्या खरेदीपोटी शेतकर्‍यांना सहा कोटी ९१ लाख  ८१ हजार ५६६ रुपये अदा करणे बाकी होते; मात्र ही रक्कमही  गेल्या पाच ते सात दिवसापूर्वीच उपलब्ध झालेली  असून,  मार्केटिंग विभागाकडून ती संबंधित बँकांकडे वळती करण्यात  आलेली आहे.

शेतकर्‍यांकडे अडीच लाख क्विंटल तूरगतवर्षी तुरीचे मुबलक पीक झाल्यामुळे बाजारात मोठय़ा  प्रमाणवर तूर विक्रीस आली होती. त्यामुळे उडणारा गोंधळ व  कमी भावात खरेदी केली जाणारी तूर पाहता राज्य शासनाने थेट  बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत दोन लाख ९४८ क्विंटल तूर खरेदी  केली होती. नाफेड अंतर्गतही मोठय़ा प्रमाणावर तूर खरेदी  करण्यात आली होती. या उपरही सध्या जिल्ह्यात दोन लाख ६0  हजार २९६ क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरात पडून असल्याचा  अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी