शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘एटीएम’चा नंबर विचारून खात्यातून ४५ हजार लंपास!

By admin | Updated: April 3, 2017 03:21 IST

बँक अधिकारी असल्याचे खोटे सांगून बंद एटीएम कार्ड चालू करण्यासाठी माहिती घेऊन खात्यातून ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास.

धामणगाव बढे (जि. बुलडाणा), दि. २- बँक अधिकारी असल्याचे खोटे सांगून बंद एटीएम कार्ड चालू करण्यासाठी माहिती घेऊन खात्यातून ४५ हजार रुपयांची रक्कम अवघ्या पाच मिनिटात काढल्याचा खळबळजनक प्रकार धा.बढे येथे घडला. १ एप्रिलनिमित्त बँकांचे सर्व व्यवहार बंद असताना सदरहू शेतकर्‍याने बँकेजवळ येऊन एटीएम कार्डसंदर्भातील माहिती दिली. ब्राह्मंदा येथील अल्पभूधारक शेतकरी परसराम जाधव यांचा मुलगा सुरेश जाधव यांना १ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता ८८७७९९३१३३ या मोबाइल नंबरवरून फोन आला. बँकेतून बोलतो असे सांगत बंद पडलेले एटीएम कार्ड चालू करण्यासाठी माहिती पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर सदरहू शेतकरी दुपारी बारा वाजता आपल्या दोन मुलांसोबत धा.बढे येथे स्टेट बँकेत गेले; परंतु १ एप्रिल रोजी आर्थिक वर्षाच्या समाप्तीनिमित्त बँकेचे व्यवहार बंद होते, तर अंतर्गत ताळेबंदासाठी बंद दरवाजाच्या आत काम सुरू होते. याची पूर्वकल्पना फोन करणार्‍याला होती. त्यामुळे त्याने अगोदरच बँकेजवळ आल्यावर फोन करण्याचे सदरहु शेतकर्‍यास सांगितले होते. त्यामुळे सदरहू शेतकर्‍याने आलेल्या नंबरवर फोन केला व बँक बाहेरून बंद असल्याचे सांगितले. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने मी बँकेतूनच बोलत आहे. तुम्ही मी विचारतो ती माहिती द्या, असे सांगितले. त्यामुळे परसराम जाधव व सुरेश जाधव या पिता-पुत्रांनी विचारलेली पूर्ण माहिती दिली. त्यावेळीच बँकेत काम करणारे राहुल चव्हाण हे काही कामानिमित्त बाहेर आले. त्यावेळी परसराम जाधव यांनी असा फोन आल्याचे सांगितले तर परसराम जाधव यांनी राहुल चव्हाणसह शाखाधिकारी आशिष दुबे यांची भेट घेतली. संबंधित शेतकरी फसविल्या गेल्याची बाब उपस्थितांच्या लक्षात आली, तर अवघ्या पाच मिनिटात परसराम जाधव यांच्या खात्यातून ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे उघड झाले. त्यानंतर परत त्याच नंबरवर जाधव यांनी फोन केला असता तुमचे एटीएम कार्ड लवकरच सुरू होईल, असे सांगत फोन बंद केला. बँकेसमोर येऊन स्वत: फोन करून माहिती देण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली.