शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

४४ पक्ष्यांची दयामरणाद्वारे विल्हेवाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST

चिखली : चिखली तालुक्यातील भानगखेड येथे ४ दिवसांपूर्वी २०० देशी कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ...

चिखली : चिखली तालुक्यातील भानगखेड येथे ४ दिवसांपूर्वी २०० देशी कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोंबड्यांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण 'बर्ड-फ्लू'च असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पशुविभागाने शिघ्र कृती दलाची स्थापना केली आहे.

भानखेडे येथील आणखी ४४ पक्ष्यांना २६ जानेवारीला दयामरण देवून पक्ष्यांसह २० अंड्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. भानखेड येथील शेतकरी जनार्दन इंगळे यांच्या शेतातील सुमारे २०० देशी कोंबड्यांचा २३ जानेवारीला अकस्मात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर तालुका पशुधन अधिकारी डॉ. दांडगे, पशुवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉ. युवराज रगतवान, पशुधन पर्यवेक्षक डॉ.प्रवीण निळे, व डॉ.पूनम तायडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. काही कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविले होते. दरम्यान, या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी तत्काळ या परिसरातील खबरदारीचे उपाय व सर्वेक्षणाचे काम १० कि.मी. त्रिज्येच्या परिसरात करून योग्य उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले आहे. या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी रोजी जिल्हा पशु उपायुक्त पी. जी. बोरकर, पं.स.पशुधन विकास अधिकारी (वि) डॉ. दांडगे व संबंधित विभागाच्या चमूने गावात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाबाबत माहिती दिली. गावात सर्व्हेक्षण केले असता सुमारे ४४ पक्षी संधिग्द स्थितीत आढळल्याने ८ पशुपालकांच्या ४४ पक्ष्यांना दयामरण देण्यात आले. यावेळी ग्रा.पं.सचिव ए.बी.जाधव, तलाठी बाहेकर, पोलीस पाटील मिलिंद इंगळे, पशू विभागाचा चमू तसेच पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

भानखेड येथील कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत

सुमारे १५२० लोकसंख्येच्या भानखेडे येथे कुक्कुटपालन व्यावसायिक शेतकरी बहुसंख्येने आहेत. याअंतर्गत अंडी देणारे सुमारे १ हजार ८८६ कोंबड्या, २ हजार २०० तितर, ४ हजार २०० मांसल पक्षी आणि ११० कबुतरे असे एकूण ८ हजार २९६ पक्ष्यांची संख्या आहे. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाने येथील कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आलेली ठिकाणे

पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू (अवैन इनफ्ल्यूएंझा) रोगाची लागण झाल्यानंतर जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी चिखली तालुक्यातील भानखेडसह, संग्रामपूर, लोणार तालुक्यातील रायगाव आणि मेहकर तालुक्यातील मादणी या ठिकाणी सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.