हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १0- जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानांतर्गंंत मार्च २0१७ पर्यंंत ग्रामीण भागातील ३५४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्यासाठी ६८ हजार शौचालये बांधकामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५७ टक्केच शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. अद्याप ४३ टक्के शौचालयांचे बांधकाम व्हायचे आहे. सध्या मार्च महिना संपत आला असल्यामुळे जिल्ह्यातील हगणदरीमुक्त मोहिमेची गती मंदावली असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींपैकी १५२ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींपैकी ३५४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्यासाठी ६८ हजार शौचालये बांधकामाचे मार्च २0१७ पर्यंंत उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात शासनाने ३१ डिसेंबरनंतर उघड्यावर शौचालयास जाणार्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. मध्यंतरी नोटाबंदीमुळे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी व कर्मचार्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कसरत होत होती. लाभार्थीस घरी शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. मात्र, नोटाबंदीमुळे शौचालय लाभार्थींंस बँक खात्यातून पैसे काढणे कठीण झाले होते. मात्र आता नोटाबंदीचे वातावरण दूर झाल्यामुळे ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला वेग आला आहे. आजरोजी मलकापूर तालुका हगणदरीमुक्त झाला असून, शेगाव तालुका ३१ मार्चपर्यंंंत हगणदरीमुक्त होणार आहे. जिल्ह्यातील नांदुरा, जळगाव जामोद, देऊळगाव राजा या तालुक्यांची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.सामाजिक कार्यक्रमातून हगणदरीमुक्तीसाठी जागृतीजिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्च २0१७ पर्यंंत असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत असले, तरी काही सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. वाढदिवस, लग्नसमारंभ आदी कार्यक्रमातून गाव हगणदरीमुक्ती तसेच शौचालय बांधकामास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून, पत्रिकेत संदेश प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे येणार्या काळात अनेक गावे हगणदरीमुक्त होतील.
शौचालयाचे ४३ टक्के उद्दिष्ट अपूर्ण!
By admin | Updated: March 11, 2017 01:41 IST