शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

३६६ भूखंडांना उद्योगाची प्रतीक्षा!

By admin | Updated: October 19, 2015 01:40 IST

उद्योगाभावी बुलडाणा जिल्ह्याचा विकास रखडला.

सिद्धार्थ आराख/ बुलडाणा : मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच जिल्ह्याचा औद्योगिक विकास रखडला असून, एकूण ७५३ भूखंडांपैकी ३६६ भूखंडावर उद्योग उभा झालेला नाही. संबंधितांनी सदर भूखंड केवळ अडवून ठेवला असून, या भूखंडांना उद्योगाची प्रतीक्षा आहे. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यावर संकटांची मालिका सतत कोसळत आहे. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम हातचा गेला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ५0 टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, बुलडाणा जिल्ह्याची नजरअंदाज आणेवारी ५९ पैसे असल्याने जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश यात करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा ह्यदुष्काळग्रस्तह्ण म्हणून तातडीच्या मदतीची अपेक्षा फोल ठरली आहे. लोकप्रतिनिधी म्हणतात, ही अंतिम आणेवारी नाही. दुसरीकडे येथे उद्योग-व्यवसायाला वाव नसल्यामुळे बेरोजगारांची फौजा वाढत आहे. ज्या जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय भरभराटीला येतो, त्या जिल्ह्याचा विकाससुद्धा झ पाट्याने होतो. बुलडाणा जिल्हा मात्र याला अपवाद ठरत आहे. जिल्ह्यात जे उद्योग सुरू आहेत, तेही अगदी बोटावर मोजण्याएवढे असल्याने रोजगाराच्या अ पेक्षित संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा कधीच सुटला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील सात औद्योगिक क्षेत्रांसाठी एकूण ६६५.७८ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. या क्षेत्रात एकूण ९९३ विकसित भूखंडांपैकी ७५३ भूखंडांचे वाटप विविध उद्योग घटकांना करण्यात आले आहे. वाटप केलेल्या या भूखंडांपैकी केवळ २८७ भूखंडांवर उत्पादन प्रक्रिया सुरू आहे, तर ३६६ भूखंडांवर आजही कोणताही उद्योग-व्यवसाय संबंधित मालकाने उभारलेला नाही. वर्षानुवर्षे हे भूखंड केवळ अडवून ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी खामगाव एमआयडीसीमध्ये ७७, मलकापूर ९२, चिखली ११३, बुलडाणा १४, देऊळगावराजा २७ आणि मेहकर एमआडीसीमध्ये ३२ भूखंड आहेत. या भूखंडांवर उद्योग सुरू करण्याची तारीख संपल्यानंतर नियमानुसार सरकारजमा करणे आवश्यक असताना, ही प्रक्रिया झालेली नसल्याने भूखंड अद्याप मालकांकडेच आहेत.