शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

३६६ भूखंडांना उद्योगाची प्रतीक्षा!

By admin | Updated: October 19, 2015 01:40 IST

उद्योगाभावी बुलडाणा जिल्ह्याचा विकास रखडला.

सिद्धार्थ आराख/ बुलडाणा : मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच जिल्ह्याचा औद्योगिक विकास रखडला असून, एकूण ७५३ भूखंडांपैकी ३६६ भूखंडावर उद्योग उभा झालेला नाही. संबंधितांनी सदर भूखंड केवळ अडवून ठेवला असून, या भूखंडांना उद्योगाची प्रतीक्षा आहे. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यावर संकटांची मालिका सतत कोसळत आहे. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम हातचा गेला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ५0 टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, बुलडाणा जिल्ह्याची नजरअंदाज आणेवारी ५९ पैसे असल्याने जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश यात करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा ह्यदुष्काळग्रस्तह्ण म्हणून तातडीच्या मदतीची अपेक्षा फोल ठरली आहे. लोकप्रतिनिधी म्हणतात, ही अंतिम आणेवारी नाही. दुसरीकडे येथे उद्योग-व्यवसायाला वाव नसल्यामुळे बेरोजगारांची फौजा वाढत आहे. ज्या जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय भरभराटीला येतो, त्या जिल्ह्याचा विकाससुद्धा झ पाट्याने होतो. बुलडाणा जिल्हा मात्र याला अपवाद ठरत आहे. जिल्ह्यात जे उद्योग सुरू आहेत, तेही अगदी बोटावर मोजण्याएवढे असल्याने रोजगाराच्या अ पेक्षित संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा कधीच सुटला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील सात औद्योगिक क्षेत्रांसाठी एकूण ६६५.७८ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. या क्षेत्रात एकूण ९९३ विकसित भूखंडांपैकी ७५३ भूखंडांचे वाटप विविध उद्योग घटकांना करण्यात आले आहे. वाटप केलेल्या या भूखंडांपैकी केवळ २८७ भूखंडांवर उत्पादन प्रक्रिया सुरू आहे, तर ३६६ भूखंडांवर आजही कोणताही उद्योग-व्यवसाय संबंधित मालकाने उभारलेला नाही. वर्षानुवर्षे हे भूखंड केवळ अडवून ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी खामगाव एमआयडीसीमध्ये ७७, मलकापूर ९२, चिखली ११३, बुलडाणा १४, देऊळगावराजा २७ आणि मेहकर एमआडीसीमध्ये ३२ भूखंड आहेत. या भूखंडांवर उद्योग सुरू करण्याची तारीख संपल्यानंतर नियमानुसार सरकारजमा करणे आवश्यक असताना, ही प्रक्रिया झालेली नसल्याने भूखंड अद्याप मालकांकडेच आहेत.