शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

३६६ भूखंडांना उद्योगाची प्रतीक्षा!

By admin | Updated: October 19, 2015 01:40 IST

उद्योगाभावी बुलडाणा जिल्ह्याचा विकास रखडला.

सिद्धार्थ आराख/ बुलडाणा : मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच जिल्ह्याचा औद्योगिक विकास रखडला असून, एकूण ७५३ भूखंडांपैकी ३६६ भूखंडावर उद्योग उभा झालेला नाही. संबंधितांनी सदर भूखंड केवळ अडवून ठेवला असून, या भूखंडांना उद्योगाची प्रतीक्षा आहे. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यावर संकटांची मालिका सतत कोसळत आहे. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम हातचा गेला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ५0 टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, बुलडाणा जिल्ह्याची नजरअंदाज आणेवारी ५९ पैसे असल्याने जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश यात करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा ह्यदुष्काळग्रस्तह्ण म्हणून तातडीच्या मदतीची अपेक्षा फोल ठरली आहे. लोकप्रतिनिधी म्हणतात, ही अंतिम आणेवारी नाही. दुसरीकडे येथे उद्योग-व्यवसायाला वाव नसल्यामुळे बेरोजगारांची फौजा वाढत आहे. ज्या जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय भरभराटीला येतो, त्या जिल्ह्याचा विकाससुद्धा झ पाट्याने होतो. बुलडाणा जिल्हा मात्र याला अपवाद ठरत आहे. जिल्ह्यात जे उद्योग सुरू आहेत, तेही अगदी बोटावर मोजण्याएवढे असल्याने रोजगाराच्या अ पेक्षित संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा कधीच सुटला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील सात औद्योगिक क्षेत्रांसाठी एकूण ६६५.७८ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. या क्षेत्रात एकूण ९९३ विकसित भूखंडांपैकी ७५३ भूखंडांचे वाटप विविध उद्योग घटकांना करण्यात आले आहे. वाटप केलेल्या या भूखंडांपैकी केवळ २८७ भूखंडांवर उत्पादन प्रक्रिया सुरू आहे, तर ३६६ भूखंडांवर आजही कोणताही उद्योग-व्यवसाय संबंधित मालकाने उभारलेला नाही. वर्षानुवर्षे हे भूखंड केवळ अडवून ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी खामगाव एमआयडीसीमध्ये ७७, मलकापूर ९२, चिखली ११३, बुलडाणा १४, देऊळगावराजा २७ आणि मेहकर एमआडीसीमध्ये ३२ भूखंड आहेत. या भूखंडांवर उद्योग सुरू करण्याची तारीख संपल्यानंतर नियमानुसार सरकारजमा करणे आवश्यक असताना, ही प्रक्रिया झालेली नसल्याने भूखंड अद्याप मालकांकडेच आहेत.