शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

३३0 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार

By admin | Updated: January 8, 2017 02:21 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक; मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित

बुलडाणा, दि. ७- सन २0१७-१८ करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय र्मयादेत ३३0.0९ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. समितीने प्रस्तावित केलेल्या आराखड्यामधून विकासाची व जनकल्याणाची कामे मोठय़ा प्रमाणावर व्हावी त, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी व्यक्त केली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाने, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सिडाम आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात आमदार राहुल बोंद्रे, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशीकांत खेडेकर, जि. प सभापती अंकुश वाघ, गणेश बस्सी आदींसह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. रस्ते विकासाला प्राधान्य देत शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, की या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या साठी नियोजनात १५ टक्के निधी ठेवण्यात आला आहे. यामुळे रस्त्यांचा विकास करण्यास निधी कमी पडणार नाही. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग राबवित असलेल्या लाभार्थी अनुदान योजनेचा निधी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देत फुंडकर म्हणाले, अशा लाभार्थींचे अनुदान बँकेने प्रलंबित ठेवू नये. लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करावे. तसेच बँकांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर होल्ड लावू नये. रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना बँक खात्यातील रक्कम उपयोगात आणता यावी, यादृष्टीने कार्यवाही करावी. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत २00 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ही रक्कम प्राप्त झाल्यास पूर्वपरवानगी घेऊन ठिबक सिंचन संच घेतलेल्या जिल्ह्यातील ठिबक सिंचन अनुदानापासून वंचित शे तकर्‍यांना अनुदान देण्यात येईल. ते पुढे म्हणाले, आदिवासी किंवा वन गावांमध्ये विकास कामांसाठी जागेची मागणी आल्यास वनहक्के दावे तातडीने मंजूर करावे. त्यासाठी उपविभागीय स्तरावरील अधिकर्‍यांच्या बैठका घ्याव्या त. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना उपविभागीय अधिकार्‍यांनाही बोलवावे. सिंचन व दळणवळण असे दोन्ही उद्देश पूर्ण होत असलेल्या पूलवजा बंधार्‍यांच्या कामांचे नियोजन करावे, अशी कामे भौतिकदृष्ट्या त पासून घ्यावीत. यामुळे सिंचनही होईल आणि दळणवळणासाठी रस्त्याचे काम होईल. मेहकर व खामगाव येथील वाटप झालेल्या घरकुलांच्या गैरप्रकाराची चौकशी करावी. चौकशी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात यावी, असे निर्देश दिले.