शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३१७ बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर

By admin | Updated: April 17, 2017 00:32 IST

अपघातास आमंत्रण : जिल्ह्यातील १६० एसटी बसलाच ‘स्पीड लिमिट’

ब्रह्मानंद जाधव - बुलडाणाहायवेवर सुसाट वेगाने धावणाऱ्या एसटी बसेसचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी परिवहन महामंडळाकडून एसटी बसला ‘स्पीड लिमिट’ची यंत्रणा बसविण्यात येते; मात्र जिल्ह्यातील ४७७ एसटी बसेसपैकी केवळ १६० बसेसलाच ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आले आहे. त्यामुळे ३१७ एसटी बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर धावतात. त्यामुळे वेगावर नियंत्रण नसलेल्या बसेस अपघातास आमंत्रण ठरतात. रस्त्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडतात. वेगावर नियंत्रण नसल्याने होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये खासगी वाहनेच नाही तर सुरक्षित प्रवासाची सदैव हमी देणाऱ्या एसटी बसही मागे नाहीत. हायवेवर सुसाट धावणाऱ्या एसटी बसेसला वेगमर्यादा नसल्याने एसटी बसेसच्या अपघाताच्या घटना घडतात. त्यासाठी आरटीओने शहरात आणि हायवेवर सुरक्षित वेगमर्यादा ठरवून दिली आहे. तसेच या वाहनांना वेग मर्यादा न ओलांडण्याची सक्ती केली आहे; मात्र अनेक वाहनचालक नियम पाळत नाहीत. एसटी बसने वेग मर्यादेचा नियम पाळावा याकरिता एसटी बसेसला ‘स्पीड लिमिट’ची यंत्रणा बसविण्यात येते. जिल्ह्यात सात ठिकाणी एसटी बसचे आगार आहे. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद यांचा समावेश आहे. या सात आगारांतर्गत ४७७ एसटी बसेस शहरासह ग्रामीण भागात धावतात. या बसेसच्या भरवशावर दररोज हजारो प्रवासी निश्चिंत होऊन प्रवास करतात; मात्र यातील अर्ध्या बसेस ह्या जुनाट इंजीनवर धावतात. तसेच एसटी बसेसचा वेग नियंत्रणात रहावा, यासाठी बसला ‘स्पीड लिमिट’ बसविणे गरजेचे असताना जिल्ह्यातील ४७७ बसेसपैकी केवळ १६० बसलाच ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आले असून, ३१७ एसटी बसेसला ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात धावणाऱ्या ३१७ बसेसचे वेगावर नियंत्रण दिसून येत नाही. वर्षातून एकदाच होते एसटीची तपासणीसर्व एसटी बसेसचे इंडिकेटर्स, हेडलाइट चालू आहेत किंवा नाही याची नियमित तपासणी होत नाही. प्रत्येक महिन्याला काही बसेस प्रादेशिक परिवहन विभागातून तपासणी करणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यातील एसटी बसेस वर्षभरानंतर एकदाच आरटीओकडे तपासणीसाठी पाठवल्या जातात. त्यामुळे बसमध्ये काही त्रुटी आढळल्यास येथील एसटीच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्त करून पुन्हा बस सोडली जाते. यातील बहुतांश बसेस तर तात्पुरत्या दुरुस्तीखालीच सुसाट धावत आहेत.