शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

३१७ बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर

By admin | Updated: April 17, 2017 00:32 IST

अपघातास आमंत्रण : जिल्ह्यातील १६० एसटी बसलाच ‘स्पीड लिमिट’

ब्रह्मानंद जाधव - बुलडाणाहायवेवर सुसाट वेगाने धावणाऱ्या एसटी बसेसचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी परिवहन महामंडळाकडून एसटी बसला ‘स्पीड लिमिट’ची यंत्रणा बसविण्यात येते; मात्र जिल्ह्यातील ४७७ एसटी बसेसपैकी केवळ १६० बसेसलाच ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आले आहे. त्यामुळे ३१७ एसटी बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर धावतात. त्यामुळे वेगावर नियंत्रण नसलेल्या बसेस अपघातास आमंत्रण ठरतात. रस्त्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडतात. वेगावर नियंत्रण नसल्याने होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये खासगी वाहनेच नाही तर सुरक्षित प्रवासाची सदैव हमी देणाऱ्या एसटी बसही मागे नाहीत. हायवेवर सुसाट धावणाऱ्या एसटी बसेसला वेगमर्यादा नसल्याने एसटी बसेसच्या अपघाताच्या घटना घडतात. त्यासाठी आरटीओने शहरात आणि हायवेवर सुरक्षित वेगमर्यादा ठरवून दिली आहे. तसेच या वाहनांना वेग मर्यादा न ओलांडण्याची सक्ती केली आहे; मात्र अनेक वाहनचालक नियम पाळत नाहीत. एसटी बसने वेग मर्यादेचा नियम पाळावा याकरिता एसटी बसेसला ‘स्पीड लिमिट’ची यंत्रणा बसविण्यात येते. जिल्ह्यात सात ठिकाणी एसटी बसचे आगार आहे. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद यांचा समावेश आहे. या सात आगारांतर्गत ४७७ एसटी बसेस शहरासह ग्रामीण भागात धावतात. या बसेसच्या भरवशावर दररोज हजारो प्रवासी निश्चिंत होऊन प्रवास करतात; मात्र यातील अर्ध्या बसेस ह्या जुनाट इंजीनवर धावतात. तसेच एसटी बसेसचा वेग नियंत्रणात रहावा, यासाठी बसला ‘स्पीड लिमिट’ बसविणे गरजेचे असताना जिल्ह्यातील ४७७ बसेसपैकी केवळ १६० बसलाच ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आले असून, ३१७ एसटी बसेसला ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात धावणाऱ्या ३१७ बसेसचे वेगावर नियंत्रण दिसून येत नाही. वर्षातून एकदाच होते एसटीची तपासणीसर्व एसटी बसेसचे इंडिकेटर्स, हेडलाइट चालू आहेत किंवा नाही याची नियमित तपासणी होत नाही. प्रत्येक महिन्याला काही बसेस प्रादेशिक परिवहन विभागातून तपासणी करणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यातील एसटी बसेस वर्षभरानंतर एकदाच आरटीओकडे तपासणीसाठी पाठवल्या जातात. त्यामुळे बसमध्ये काही त्रुटी आढळल्यास येथील एसटीच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्त करून पुन्हा बस सोडली जाते. यातील बहुतांश बसेस तर तात्पुरत्या दुरुस्तीखालीच सुसाट धावत आहेत.