शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अवकाळी पावसाने ३१ हजार शेतकऱ्यांचे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By विवेक चांदुरकर | Updated: March 7, 2024 15:35 IST

सर्वेक्षणानंतर कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

खामगाव : जिल्ह्यात २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २६ व २७ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने ३१ हजार ५१० शेतकऱ्यांचे २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर प्राथमिक अहवालात निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात २६ ते २८ ऑगस्टच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला. खरीप हंगामात कमी पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले. त्यातच कपाशी व सोयाबीनला अल्प भाव आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होत्या. रब्बी हंगामात मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, रब्बी कांदा, ज्वारी, मका या पिकांची पेरणी केली. मात्र, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे शेतीपिके व फळपिकांच्या बाधित झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाजित अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २६ व २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने ३१ हजार ५१० शेतकऱ्यांचे २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, २७ व २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी पावसामुळे १३९ गावांतील ९२७४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सात तालुक्यांत भाजीपाल्याचे नुकसान२६ व २७ फेब्रवारी दरम्यान आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने सात तालुक्यांतील भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये सिंदखेड राजा, बुलढाणा, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा या तालुक्यांत नुकसान झाले आहे.

१५ फेब्रुवारी रोजी ११७ हेक्टरवर नुकसानखामगाव तालुक्यात १५ फेब्रुवारी रोजी आलेल्या पावसामुळेही नुकसान झाले आहे. यामध्ये १५ गावांत ११७.६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, ज्ञानगंगापूर, वाकूड, कुर्हा, राहूड, पिंप्री देशमुख, सुजातपूर, चिखली बु. व खुर्द, लांजूड व हिवरा खुर्द या गावांचा समावेश आहे.