शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

अवकाळी पावसाने ३१ हजार शेतकऱ्यांचे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By विवेक चांदुरकर | Updated: March 7, 2024 15:35 IST

सर्वेक्षणानंतर कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

खामगाव : जिल्ह्यात २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २६ व २७ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने ३१ हजार ५१० शेतकऱ्यांचे २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर प्राथमिक अहवालात निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात २६ ते २८ ऑगस्टच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला. खरीप हंगामात कमी पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले. त्यातच कपाशी व सोयाबीनला अल्प भाव आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होत्या. रब्बी हंगामात मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, रब्बी कांदा, ज्वारी, मका या पिकांची पेरणी केली. मात्र, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे शेतीपिके व फळपिकांच्या बाधित झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाजित अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २६ व २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने ३१ हजार ५१० शेतकऱ्यांचे २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, २७ व २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी पावसामुळे १३९ गावांतील ९२७४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सात तालुक्यांत भाजीपाल्याचे नुकसान२६ व २७ फेब्रवारी दरम्यान आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने सात तालुक्यांतील भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये सिंदखेड राजा, बुलढाणा, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा या तालुक्यांत नुकसान झाले आहे.

१५ फेब्रुवारी रोजी ११७ हेक्टरवर नुकसानखामगाव तालुक्यात १५ फेब्रुवारी रोजी आलेल्या पावसामुळेही नुकसान झाले आहे. यामध्ये १५ गावांत ११७.६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, ज्ञानगंगापूर, वाकूड, कुर्हा, राहूड, पिंप्री देशमुख, सुजातपूर, चिखली बु. व खुर्द, लांजूड व हिवरा खुर्द या गावांचा समावेश आहे.