शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:27 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. 

ठळक मुद्दे जलसंकट : पिण्याचे पाणी, चाराटंचाई भेडसावणार!मागील चार वर्षांंत सर्वात कमी जलसाठय़ाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे  ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा पेनटाकळी असे तीन  मोठे प्रकल्प आहेत, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन,  तोरणा उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यावर्षी  पावसाने सुरुवातीपासून हुलकावणी देण्यास सुरुवात केली आहे;  मात्र मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात  परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश नदी, नाल्यांना पूर  गेला. काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात पुराचे पाणी  जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे; मात्र जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात अल्प वाढ झाली आहे.  सद्यस्थितीत या प्रकल्पात ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध  आहे.जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी नळगंगा प्रकल्पात  ३८.८९, पेनटाकळी प्रकल्पात ३६.९२ व खडकपूर्णा प्रकल्पात  १३.२७ असा एकूण मोठय़ा प्रकल्पात २७.६१ टक्के जलसाठा  आहे, तर सात मध्यम प्रकल्पांपैकी पलढक प्रकल्प १00 टक्के,  ज्ञानगंगा प्रकल्पात ५२.२५, मस प्रकल्पात २९.४५, कोराडी  प्रकल्पात ३४.२६, मन प्रकल्पात २८.२७, तोरणा प्रकल्पात  ४0.१८ व उतावळी प्रकल्पात ३७.७0 असा एकूण सात  प्रकल्पात ४१.0६ तसेच एकूण ८१ लघू प्रकल्पांत २९.0३ टक्के  जलसाठा असा एकूण जिल्ह्यातील ९१ मोठे, मध्यम व लघू  प्रकल्पात ३१.५१ टक्के जलसाठा आला आहे. सदर जलसाठा  अल्प असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई व चाराटंचाई  भेडसावणार आहे. परतीच्या पावसामुळे नदी, नाले भरल्यामुळे  काठावरील काही गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली  आहे; मात्र पाण्याचा अल्पसाठा असल्यामुळे उन्हाळय़ात त्रास  सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी