शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:27 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. 

ठळक मुद्दे जलसंकट : पिण्याचे पाणी, चाराटंचाई भेडसावणार!मागील चार वर्षांंत सर्वात कमी जलसाठय़ाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे  ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा पेनटाकळी असे तीन  मोठे प्रकल्प आहेत, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन,  तोरणा उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यावर्षी  पावसाने सुरुवातीपासून हुलकावणी देण्यास सुरुवात केली आहे;  मात्र मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात  परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश नदी, नाल्यांना पूर  गेला. काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात पुराचे पाणी  जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे; मात्र जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात अल्प वाढ झाली आहे.  सद्यस्थितीत या प्रकल्पात ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध  आहे.जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी नळगंगा प्रकल्पात  ३८.८९, पेनटाकळी प्रकल्पात ३६.९२ व खडकपूर्णा प्रकल्पात  १३.२७ असा एकूण मोठय़ा प्रकल्पात २७.६१ टक्के जलसाठा  आहे, तर सात मध्यम प्रकल्पांपैकी पलढक प्रकल्प १00 टक्के,  ज्ञानगंगा प्रकल्पात ५२.२५, मस प्रकल्पात २९.४५, कोराडी  प्रकल्पात ३४.२६, मन प्रकल्पात २८.२७, तोरणा प्रकल्पात  ४0.१८ व उतावळी प्रकल्पात ३७.७0 असा एकूण सात  प्रकल्पात ४१.0६ तसेच एकूण ८१ लघू प्रकल्पांत २९.0३ टक्के  जलसाठा असा एकूण जिल्ह्यातील ९१ मोठे, मध्यम व लघू  प्रकल्पात ३१.५१ टक्के जलसाठा आला आहे. सदर जलसाठा  अल्प असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई व चाराटंचाई  भेडसावणार आहे. परतीच्या पावसामुळे नदी, नाले भरल्यामुळे  काठावरील काही गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली  आहे; मात्र पाण्याचा अल्पसाठा असल्यामुळे उन्हाळय़ात त्रास  सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी