शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

खारपाणपट्टय़ातील शुद्ध पेयजलासाठी २२२ कोटींचा खर्च

By admin | Updated: October 7, 2015 23:48 IST

संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील १४0 गाव पाणीपुरवठा योजनेचे काम ५६ टक्के पूर्ण.

जयदेव वानखडे / जळगाव जामोद (जि. बुलडाणा): खारपाणपट्टय़ामुळे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची झालेली हेळसांड पाहता, उच्चाधिकार समितीच्या अहवालानुसार या दोन्ही तालुक्यातील १६६ गावांपैकी १४0 गावांमध्ये शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने २२२ कोटी २२ लाख ९१ हजार रुपये खर्च करून १४0 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. सप्टेंबर अखेर या योजनेवर १२0 कोटी १६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. दरम्यान, ही योजना मार्च २0१७ पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येणार असून, या १४0 गावातील २0३0 ची चार लाख लोकसंख्या विचारात घेऊन योजनेवर सध्या काम केले जात आहे. वान प्रकल्पावरून ही योजना असून, ती पुर्णत्वास गेल्यास खारपाणपट्टय़ातील जळगाव जामोद शहरास जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील १४0 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या दोन्ही तालुक्यात क्षारयुक्त पाण्यामुळे सातत्याने किडनीच्या आजाराने नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यानुषंगाने या भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. २ डिसेंबर २0१३ मध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने या योजनेस मान्यता दिली होती. २0१४ मध्ये योजनेने आकार घेण्यास सुरुवात केली आहे. जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी या योजनेसाठी व्यक्तिगत स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने आता योजनेचे जवळपास ५६ टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत २0११0१२ आणि २0१२-१३ च्या कृती आराखड्यात ही योजना प्रस्तावित करण्यात आली होती. २0३0 ची दोन्ही तालुक्यातील या गावांची ४ लाख ४ हजार ३२0 लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.