शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

२२ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By admin | Updated: July 6, 2014 23:32 IST

वीज भारनियमनामुळे मात्र आता पश्‍चिम विदर्भातील २२ हजार हेक्टरवरील पिकेही संकटात आहेत.

खामगाव: पावसाअभावी यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली आहे. तुषार व ठिबक सिंचनाव्दारे या पिकांना जगवण्याचे प्रयत्न शेतकर्‍याकडून केले जात असले तरी वीज भारनियमनामुळे मात्र आता पश्‍चिम विदर्भातील २२ हजार हेक्टरवरील पिकेही संकटात आहेत. गतवर्षी झालेला समाधानकारक पाऊस व फेब्रुवारी-मार्च महिन्यात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाल्याने यावर्षी काही भागात अद्याप जलसाठा तग धरून आहे. मात्र महिनाभरापासून पावसाचा थेंबही नसल्याने ही जलाशय पातळी घसरली आहे. यावर्षी मृग नक्षत्र कोरडा गेला तर आद्र्रा नक्षत्रही कोरडे जाण्याची भिती आहे. यामुळे शेतकर्‍यावर पेरणीचे फेरनियोजन करण्याची वेळ आली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कपाशीची लागवड केली. ठिबक व तुषार सिंचनाव्दारे पाणी दिले जात असून हवेत डोलणारी ही पिके जगविण्यासाठी बळीराजा धडपडत आहे. अशातच विज वितरण कंपनीकडून कृषीपंपासाठी पुरेसा वीज पुरवठा होत नसल्याने या पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. अगोदरच एक दिवसाआड वीज पुरवठा होत आहे. मात्र त्यातही कधी ह्यब्रेकह्ण मिळेल, याची शाश्‍वती नसल्याने शेतकर्‍यांना २४ तास वीज पुरवठय़ाकडे लक्ष देवून कपाशीला पाणी द्यावे लागत आहे. ठिबक व तुषार सिंचनावर उपलब्ध सिंचन सुविधेमध्येही बागायती शेती वीज भारनियमनाने धोक्यात आली आहे. अगोदर अस्मानी तर आता सुलतानी संकटाने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.