शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

२00 हेक्टरवरील सोयाबीन वाळले

By admin | Updated: September 22, 2014 23:48 IST

सोयाबीनचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाळून गेले आहे.

लोणार : तालुक्यातील खळेगाव व अंजनी खुर्द शिवारातील २00 हेक्टरवरील सोयाबीनचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाळून गेले आहे. या नुकसानीची पाहणी करून मदतीच्या मागणीसाठी शेतकरी आपल्या शेतातील सुकलेली सोयाबीनची झाडे घेऊन चक्क तहसील कार्यालयावर धडकले. दरम्यान, या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याच्या मागणीचे निवेदनही तहसीलदारांना यावेळी दिले. गेल्या वर्षभरापासून शेतकर्‍यांवर अस्मानी संकट राहिले आहे. अतवृष्टीनंतर गारपीट आणि आता समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन पीक वाळून गेले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतीत उत्पन्न न झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे तसेच कीड व रोगांचा मारा यामुळे २00 हेक्टरवरील शेतातील सोयाबीनचे पीक करपून गेले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या शेतकर्‍यांनी नायब तहसीलदार मते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मनसेचे विनोद वाघ, शेतकरी बाबाराव मुंढे, बद्रीनाथ सानप, सुभाष सानप, भागवत वायाळ, सुधाकर वायाळ, संतोष वायाळ, माधव सानप, दिनेश कांगणे, रामदास आंधळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतातील सोयाबीनची सुकलेली झाडेच आणल्याने ते सर्वांचे आकर्षण ठरले.