शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

बुलडाणा जिल्ह्यातील २० मुले घेताहेत माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 18:28 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २० मुले गेल्या महिनाभरापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे गिरवत आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा:  बोलिलीं लेंकुरें, वेडी वाकुडीं उत्तरें!करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध!नाहीं विचारिला, अधिकार म्यां आपुला!तुका म्हणें ज्ञानेश्वरा, राखा पायां पैं किंकरा!तुकाराम महाराजांनी माऊलींसाठी म्हटलेल्या ह्या अभंगाच्या ओळींना बुलडाणा जिल्ह्यातील मुले आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींसमोर उजाळा देत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २० मुले गेल्या महिनाभरापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे गिरवत आहेत. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील लक्ष्मण महाराज यांनी या सर्व मुलांची मोफत व्यवस्था आळंदी येथे केली आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या या मुलांना संस्कृतबरोबरच इरत भाषा व आध्यात्माचे शिक्षण दिल्या जात आहे. बालकांमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी अनेक ठिकाणी मुलांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्याचा नवा पायंडाच निर्माण झाला आहे. मुलांना शाळेला सुट्या लागल्यानंतर एखाद्या मंदिरावर संस्कार शिबीर घेण्याचे अनेक उपक्रम आपल्याला सापडतील. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी त्यांना संस्कृत येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. त्यामुळे मुलांचे मन सुसंस्कारित करण्यासाठी आणि तेही प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतच मुलांमध्ये संस्काराबरोबरच संस्कृतचे ज्ञान देण्यासाठी मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील लक्ष्मण महाराज यांनी बुलडाणा जिल्ह्यातून घाटनांद्र व परिसरातील अशी २० मुले आळंदी येथे नेले आहेत. आळंदी येथील श्रीगुरू देऊ फड याठिकाणी संस्कृत व संस्कार शिबीर घेण्यात येत आहे. त्यामध्ये मुलांना आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच संस्कृत भाषेचा परिचही करून दिला जात आहे. प्रत्यक्ष माऊलींच्या आळंदीत हे शिबीर घेतले जात असल्याने मुलांमध्ये या शिबीराचे एक वेगळे आकर्षण आहे. मुलांची राहण्याची, भोजनाची व त्यांना सांभाळण्याची सर्व जबाबदारी लक्ष्मण महाराज देशमुख यांनी समर्थपणे उचलली आहे. 

इंद्रायणी मातेची स्वच्छतामुलांना सदाचार, साधना, धर्मप्रेम अन राष्ट्रभक्ती शिकवण्या बरोबरच स्वच्छतेचेही महत्त्व त्यांना प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिल्या जात आहे. प्रत्येक रविवारी आळंदीतील इंद्रायणीच्या परिसरात मुले स्वच्छता करत आहेत. 

दैनंदिन कार्यक्रमसकाळी चार वाजता उठल्यानंतर भ्रमण जप (रामकृष्ण हरी जप), अंघोळ आटोपल्यानंतर पाच ते सहा नगर प्रदक्षणा, माऊली दर्शन, सूर्यनमस्कार, प्राणायक, हनुमान चालिसा, सकाळी ८.३० ते ११ पाठांतर व लिखाण,  दुपारी पाठ त्यामध्ये रचना, कौमोदी संस्कृत, सायंकाळी हरिपाठ, झोपण्यापूर्वी गायत्री व मृत्यंूजय मंत्राचा जप असे दिवसभरातील नियोजन असते. 

 पाल्यांना  सुसंस्कारीत करण्यासाठी पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे. आज संस्कार शिबीर व संस्कृत शिकणे ही काळाची गरज झाली आहे. आळंदी येथे मुलांना आध्यात्माचे धडे देऊन त्यांना सुसंस्कारीत करण्याचा हा प्रयत्न आहे. लक्ष्मण महाराज देशमुख (आळंदीकर).

टॅग्स :buldhanaबुलडाणा