शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रोजगार हमीच्या कामात २ कोटींचा अपहार

By admin | Updated: January 26, 2015 00:54 IST

बुलडाणा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार; मेहकर तालुक्यात सर्वाधिक ३३ अपहाराची प्रकरणे.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा :ह्यअध्र्यात तुम्ही अध्र्यात आम्हीह्ण यालाच म्हणतात रोजगार हमी. या उक्तीप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजनेसह अन्य ग्रामविकासाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी ग्राम विकासासाठी नव्हे, तर स्वविकासासाठी वापरल्याचे सिद्ध झाले आहे. रोहयोची योजना सुरू झाल्यापासून आजतागायत सुमारे २0३ अपहाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये शासनाच्या २ कोटी ८१ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे सिद्ध झाले आहे. माहितीच्या अधिकारात हे घबाड बाहेर आले आहे. शहरी विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाचा विकास हा उद्देश समोर ठेवून शासनाने ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अशा विविध योजना सुरू केल्या. त्यातीच रोजगार हमी योजना, जवाहर ग्रमासमृद्धी योजना आणि अलीकडे सुरू झालेली मनरेगा. या योजनेच्या माध्यमातून विहीर खोदणे, तलाव व नाल्यातील गाळ काढणे, नालाबंडिंग, रोपवाटिका केंद्र उभारणे, रस्त्यांची कामे यासारखी कामे केली जातात. मजुराच्या हाताला काम देण्याबरोबरच या माध्यमातून खेड्याचा विकास साधल्या जातो; मात्र कर्मचारी-अधिकार्‍यांच्या संगनमताने या योजनसाठी येणारा कोट्यवधी रुपयाचा निधी हडप केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २0१४ पर्यंत ८६६ ग्रामपंचायतीमध्ये अपहाराच्या २0३ प्रकरणात २ कोटी ८१ लाख ६५ हजार ८७६ रुपयाचा निधी हडप केल्याचे उघडकीस झाले आहे. यापैकी आतापर्यंत १0२ प्रकरणाची प्रशासनाने चौकशी केली असून, केवळ ५२ प्रकरणे निकाली काढले आहेत. चौकशीअंती जेमतेम १३ लाख ८४ हजार रुपये वसूल करून शासनाच्या तिजोरीत भरण्यात आले आहेत. तर १0१ प्रकरणांची अद्याप साधी प्राथमिक चौकशीसुद्धा झाली नसल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे. म्हणजे अजूनही वसुलीस पात्र असलेल्या प्रकरणातून संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून सुमारे दीड कोटी रुपये वसूल करणे बाकी आहेत.